+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustबाबाभाई वसा म्हणजे कोल्हापूरच्या उद्यमनगरीचा अभ्यासू-उद्योजक ! शोकसभेत उद्योजकांनी जागविल्या आठवणी !! adjustविभागीय क्रीडा स्पर्धेत शहीद महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे यश adjust कोल्हापुरात काँग्रेसचा सरप्राइज चेहरा कोण ? आज उत्तर मिळणार ! adjust शिवसेनेकडून आमदार प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरकेंना उमेदवारी adjustदक्षिणमध्ये पाटील, महाडिकांनी घेतले अर्ज ! उत्तरसाठी अर्ज घेणाऱ्यांत व्ही.बी, सत्यजित कदम यांची नावे !! adjustदूध उत्पादकांसाठी खुशखबर, गोकुळतर्फे नवीन ४००० बायोगॅस मंजूर ! चेअरमन अरुण डोंगळे adjustप्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांंना ३५ हजार रुपयांचा दंड, ३०० किलो प्लॅस्टिक जप्त adjustराहुल आवाडे गुरुवारी अर्ज भरणार adjust कोल्हापुरात बाइकस्वारांची धूम adjustशिवाजी विद्यापीठ नियतकालिक स्पर्धेत विवेकानंद कॉलेज प्रथम
1001157259
1001130166
1000995296
schedule09 Jul 24 person by visibility 152 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : डेंगी आणि चिकनगुनिया रुग्णांच्या संख्येत वाढत होत आहे. कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्व्हेत शहरातील ३१ ठिकाणे धोकादायक जाहीर केल आहेत. या भागात तपासणीबरोबरच सफाईवर अधिक लक्ष केंद्रित केले. धूर, फवारणी केली जात आहे. महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातंर्गत हा सर्व्हे केला आहे. जून महिन्यापासून रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
दहा आरोग्य केंद्राने केलेल्या सर्व्हेत आढळलेल्या रुग्णांवरुन संबंधित परिसर धोकादायक जाहीर केले आहेत. यामध्ये जोशीनगर, पांजरपोळ, दौलतनगर, शिवाजी पेठ, दुधाळी, उत्तरेश्वर पेठ, कसबा बावडा, लाइनबाजार, कनाननगर, टेंबलाईवाडी, विक्रमनगर, सुभाषनगर, यादवनगर, बालाजी पार्क, रामानंदनगर, राजेंद्रनगर, वर्षानगर, फुलेवाडी, लक्षतीर्थ वसाहत, सदरबाजार , विचारेमाळ, भोसलेवाडी, कदमवाडी, बापट कॅम्प, सिद्धार्थनगर, सीपीआर, रमणमळा, बुधवार पेठ, मोरे-मानेनगर, साळोखेनगर हे परिसर धोकादायक म्हणून निश्चित केले आहेत. जून महिन्यात शहरात ४९ डेंगीचे रुग्ण आढळले होते. तर जुलै महिन्यात पहिल्या आठवड्यातच तेरा रुग्ण आढळले आहेत.
या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. परिसरातील पाणी साचणारी भांडी रिकामी करावीत, कुंडी, फ्रीज, टेरेसवर पडलेले साहित्य, खराब टायरमधील पाणी काढावे. अंग झाकले जाईल असे कपडे परिधान करावेत असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. आरोग्य विभागाने डास, अळयांच्या तपासणीसह सफाईवर लक्ष केंद्रित केले आहे.