Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळमध्ये अरुण नरके गट भाजपसोबत,  महाडिकांशी दोस्ताना कायमशहीद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरामहात्मा फुले विद्यालयात हॅप्पी डिजिटल क्लासरुम, मॉडेल स्कूलसाठी प्रयत्नशीलकौन्सिल ऑफ एज्युकेशनतर्फे निमशिरगावमध्ये शंभरहून अधिक वृक्षांची लागवडकास्ट्राईब कर्मचारी कल्याण संघातर्फे शाहू जयंती साजरीब्राह्मण सभा करवीर मंगलधामच्या श्रीराम कथा - निरूपण सोहळ्याची सांगता पुणे नव्हे कोल्हापूर हेच विद्येचे माहेरघर ! पुण्यात अभिजनांना विद्या, कोल्हापुरात बहुजनांना शिक्षणाची सुविधा ! ! डॉ. मंजुश्री पवारशिवसेना ठाकरे पक्षाच्या युवा सेनेतर्फे शिक्षण मंत्र्यांच्या विरोधात आंदोलनसतेज पाटलांनी राजकारणात सभ्यता पाळावी, त्यांच्या विरोधात आमच्याकडेही व्हिडिओ - राजेश क्षीरसागरना मुहूर्त पाहतो, ना स्वत: श्रीफळ वाढवितो…अमावस्येला कामाला प्रारंभ, कर्मावर विश्वास ! संजय घोडावतांचा अनोखा बिझनेस फंडा !!

जाहिरात

 

कोल्हापुरातील वसतिगृहे शाहू महाराजांच्या द्रष्टेपणाचे प्रतीक

schedule18 Dec 23 person by visibility 382 category

** 
डॉ. शां. ब. मुजुमदार यांचे अक्षरगप्पा मध्ये प्रतिपादन

कोल्हापूर : सर्व समाजातील मुले शिकावीत यासाठी विविध जाती धर्माची वसतिगृहे उभारण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी पुढाकार घेतला. त्यामुळेच हजारो मुलांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर झाला. कोल्हापुरातील ही वसतिगृहे छत्रपती शाहू महाराजांच्या दृष्टेपणाचे प्रतिक आहेत असे प्रतिपादन सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे संस्थापक पदमभूषण डॉ. शां.ब. मुजुमदार यांनी केले.
         ‘अक्षर दालन’ आणि ‘निर्धार’ यांच्यावतीने आयोजित अक्षरगप्पांच्या ११० व्या कार्यक्रमातील प्रकट मुलाखतीवेळी ते बोलत होते. माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
      गडहिंग्ललज येथील प्राथमिक, माध्यमिक शिक्षण, कोल्हापूरमधील राजाराम महाविद्यालयातील अध्ययन, सारस्वत बोर्डिंगमधील वास्तव्य आणि गोखले महाविद्यालयातील अध्यापन अशा अनेक आठवणी यावेळी डॉ. मुजुमदार यांनी जागविल्या. ते म्हणाले, शाहू महाराज जातपात मानत नसताना त्यांनी जातनिहाय वसतिगृहे का काढली अशी विचारणा केली जाते. परंतू त्या काळाचा विचार करता सर्व जातीधर्मातील मुले शिकावीत यासाठी त्यांनी व्यावहारिक मार्ग काढला आणि त्याचा आजही सर्व जातीधर्मातील विद्यार्थ्यांना उत्तम असा फायदा होत आहे.
     सामाजिक काम करताना अपमान गिळायला शिकण्याची गरज असून त्या काळातही मला असे अनेक अनुभव आले. परंतू जिद्द, स्वच्छ हेतू आणि कष्टाची प्रचंड तयारी यामुळे यश मिळत गेले. नियतीनेही साथ दिली आणि आज सिंबायोसिस हा भारतातील शिक्षण क्षेत्रातील एक दर्जेदार बॅंड बनला आहे. कोणत्याही राष्ट्राचा विकास होण्यासाठी शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही गोष्टींवर अधिक भर देण्याची गरज असून या दोन्ही क्षेत्रात सिंबायोसिस आघाडीवर आहे. रवींद्र जोशी यांनी स्वागत केले. यावेळी संजीवनी मुजुमदार, माजी प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे, डॉ. एच. व्ही. देशपांडे, प्राचार्य डॉ. आर. बी. भुयेकर, नील पंडित बावडेकर, नीतू बावडेकर, सतीश घाळी, राम देशपांडे, प्रभाकर हेरवाडे, राहूल चिकोडे, डॉ. आशुतोष देशपांडे, प्रा. महादेव नरके, जयंत हरळीकर, सारस्वत बोर्डिंगचे पदाधिकारी यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
एका घटनेने बदलले आयुष्य
डॉ. मुजुमदार म्हणाले, फर्ग्युसन कॉलेजमध्ये मी रेक्टर होतो. एका माॅरिशसच्या विद्यार्थ्यांला एक मुलगी बाहेरून सलग काही दिवस जेवण आणून देत होती. हा नेमका प्रकार काय आहे याची माहिती घेतल्यानंतर तो मुलगा काविळीने आजारी होता. त्याची बहिण त्याला बाहेरून जेवण आणून देत होती. मला खरा प्रकार समजला आणि मग मी पुण्यात शिकायला आलेल्या विदेशी मुलांच्या अडचणी समजून घेतल्या. तर त्यांचे पुणे आणि भारताबद्दल मत वाईट होत चालले होते. म्हणूनच या सर्व विद्यार्थ्यांसाठी मी सिंबायोसिस उभी करण्याचा निर्णय घेतला. या एका साध्या घटनेतून सिंबायोसिसचा जन्म झाला. 
फोटो कॅप्शन 
सिम्बॉयोसिसचे संस्थापक डॉ.शां. ब. मुजुमदार यांची समीर देशपांडे यांनी कोल्हापूर येथे अक्षर गप्पा कार्यक्रमांमध्ये प्रकट मुलाखत घेतली.

नेर्लीच्या शेतकरी कुटुंबातील कन्येचा यूपीएससीच्या परीक्षेत लख्ख यश

schedule05 Aug 20 person by visibility 637 categoryलाइफस्टाइल

 ……………………….


महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :

तीन वर्षापूर्वी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. पहिला प्रयत्न असफल ठरला. अपयश आले म्हणून पुन्हा नेटाने अभ्यास केला आणि दुसऱ्याच प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले. नेर्ली येथील शेतकरी कुटुंबांतील डॉ. प्रणोती संकपाळ यांचा हा यशस्वी प्रवास.

 केंद्रीय लोकसेवा आयोगाने २०१९ मध्ये घेतलेल्या परीक्षेचा निकाल चार ऑगस्ट रोजी जाहीर झाला. या परीक्षेत डॉ. संकपाळ या ५०१ व्या रँकने परीक्षा उत्तीर्ण झाल्या. शेतकरी कुटुंबांतील मुलीचा हा सक्सेस मंत्रा आपसूकच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यासाठी प्रेरणादायी आहे.

डॉ. संकपाळ यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचे हा मनाशी संकल्प केला होता. अअभ्यासासाठी पुणे गाठले. दिल्लीत जाऊन मुलाखत प्रक्रियेची तयारी केली. मनात जिद्द असेल तर यश मिळवता येत हे त्यांनी दाखवून दिले.

प्रणोती ही पहिलीपासूनच हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखली जायची. दहावीला ९५ टक्के गुण मिळवले. विवेकानंद कॉलेजमधून अकरावी आणि बारावीचे शिक्षण घेतले. बारावीला विज्ञान शाखेत ८९ टक्के गुण घेतले. बारावीनंतर सांगली येथील भारती विद्यापीठातून बीडीएसचा अभ्यासक्रम पूर्ण केला.

प्रशासकीय सेवेत करिअर करायचं असा मनाशी ठाम संकल्प करुन २०१७ मध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यासाला सुरुवात केली. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पहिल्या प्रयत्नात अपयश झाले. पहिलाच प्रयत्न, पदरी अपयश मात्र खचून न जाता पुन्हा नव्याने अभ्यासक्रमाला सुरुवात केली.

अभ्यासाचे टाइमटेबल तयार केले. २०१९ मध्ये आयोगाची परीक्षा दिली. दुसऱ्या प्रयत्नात यशाला गवसणी घातली. डॉ. प्रणोती या शेतकरी कुटुंबांतील. त्यांच्या यशाचा आनंद प्रत्येकाला झाला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगातील परीक्षेच्या यशाविषयी प्रणोती म्हणतात,‘ यूपीएससी परीक्षेतील यशासाठी अभ्यासातील सातत्य हे महत्वाचे आहे. अभ्यासक्रमाचे योग्य वेळापत्रक, अभ्यासातील सातत्य हेच यशामागील रहस्य आहे. कुटुंबीयांनी मला सातत्याने प्रोत्सहित केले.त्यामुळे यशाची गुढी उभारु शकले. हे यश केवळ माझ्या एकटीचे नाही. ते माझ्या कुटुंबीयांचे आहे. माझ्या यशात कुटुंबीय व मित्रमंडळीचा मोलाचा वाटा आहे.’


जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes