Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
आधी नोंदणी - मग स्थापना, तरीही संरक्षण ? गोकुळमधील अवसायन संस्थेसंबंधी उलटसुलट चर्चामंगेश चिवटेंना शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेत पाठवा : आमदार राजेश क्षीरसागर,  आमदार सुहास बाबर यांची  मागणीगोकुळच्या राजकारणात आमनेसामने उभे ठाकलेले एसटी बसेसच्या उद्घाटनला एकत्रविद्यार्थी चमकले शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत, शाळेने काढली मिरवणूक झोकात!व्यापारी किशोरकुमार नष्टे यांचे निधनजुनी पेन्शनसाठी शिक्षकदिनी शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चानैसर्गिक न्यायतत्वाद्वारे त्या संस्थांनाही मतदानाचा अधिकार मिळावा -विकास पाटील कुरुकलीकरकोल्हापुरात मंगळवारी अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनविवेकानंद संस्थेकडून ४४ हजार फॉर्म जमा, चंद्रकांत पाटील म्हणाले, तर कौस्तुभला तिकीट अन् विजयही निश्चितस्थायी समितीत पाठपुरावा, ४३३ ग्रामपंचायतीला मिळाले आर्थिक खर्चाचे अधिकार

जाहिरात

 

णण छ

schedule06 Mar 26 person by visibility 215 category

*जिल्ह्यात साजरा होणार जलमहोत्सव- कार्तिकेयन एस.*

कोल्हापूर, दि. 6 (जिमाका) : ग्रामीण पाणीपुरवठा व्यवस्था अधिक शाश्वत व मजबूत करण्यासाठी तसेच पाणी संवर्धनाबाबत जनजागृती आणि सामुदायिक लोकसहभाग वाढवण्यासाठी जिल्ह्यात ८ ते २२ मार्च या कालावधीत ‘जलमहोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी दिली.

या महोत्सवांतर्गत जिल्ह्यातील गावोगावी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. पाण्याच्या संवर्धानासाठी स्थानिक परंपरा यांचा उपयोग मुख्यत: विचारात घ्यावेत तसेच पिण्याच्या पाण्याला सांस्कृतिक आणि सामाजिक प्राधान्य देणे, राज्य ते गावस्तरापर्यंत विविध विभागांमध्ये समन्वय साधणे, पाणी गुणवत्ता, सौर ऊर्जा आणि देखभाल दुरूस्तीसाठी दिर्घकालीन आराखडा तयार करणे, आरोग्य, पोषण आणि महिला सक्षमीकरणाला जलसेवेशी जोडणे या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. गावस्तरावर लोक सहभागातून जल उत्सव आयोजित केला जाईल. 

गावागावात पाणी तपासणीसाठी महिलांना प्रोत्साहन देणे, फिल्ड टेस्टिंग किटद्वारे पाण्याची गुणवत्ता तपासणी करणे, प्रत्येक गावात युवकांचा जल सवर्धनासाठी सहभाग घेणे. जिल्ह्यातील शाळांमध्ये जलसंवर्धनासाठी स्पर्धाचे आयोजन करणेत येणार आहेत. ग्रामपंचायत विकास आराखड्यात पाण्याच्या संवर्धानासाठी उपाययोजनांचा समावेश करण्यासाठी भर देण्यात येणार असल्याची माहिती जल जीवन मिशनच्या प्रकल्प संचालक माधुरी परीट  यांनी दिली.
0000

भाजप

schedule08 Jan 22 person by visibility 764 category

पंजाबमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याप्रसंगी सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या त्रुटी बद्दल भाजपा कोल्हापूरच्यावतीने मशाल मोर्चा : सर्व संबंधितांवर कडक कारवाईची मागणी

कोल्हापूर दि.७ दिनांक ५ रोजी पंजाब येथे हुसैनीवाला भागात शहीद स्मारकाला भेट देण्यासाठी जाणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाहनांचा ताफा शेतकरी आंदोलकांनी एका फ्लायओव्हरवर रोखला. या एकाच ठिकाणी पंतप्रधान मोदीजी यांना वीस मिनिटे थांबावे लागले. देशाच्या पंतप्रधानांच्या दौऱ्याबाबतच्या या अतिशय गंभीर त्रुटीचा निषेध करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने बिंदू चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मशाल मोर्चा काढण्यात आला.

बिंदू चौक येथे भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन मशाल प्रज्वलित करून तीव्र शब्दांत निषेध नोंदवला याप्रसंगी ‘पंजाब सरकार हाय हाय’, ‘पंजाब काँग्रेस हाय हाय’, ‘प्रभू श्री राम की कृपासे गूंज रहा है नाम,,मोदी मोदी जय श्री राम!!, ‘प्रधानमंत्रीजी का अपमान नही सहेगा हिंदुस्तान’, ‘मुर्दाबाद मुर्दाबाद चन्नी चवन्नी सरकार मुर्दाबाद’, ‘वो देश नही झुकने देगा हम उसे नही झुकने देंगे’ ‘वंदे मातरम’, ‘भारतीय जनता पार्टीचा विजय असो’ अशा आशयाचे फलक दर्शवण्यात आले. यानंतर बिंदू चौक पासून छत्रपती शिवाजी महाराज चौक याठिकाणी येत सर्वांनी मशाल, मेणबत्ती हाती घेत निषेध नोंदवला.

याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले, पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या दौऱ्यावेळी जे काही घडलं ते अत्यंत गंभीर होतं. या घटनेचा भारतीय जनता पार्टी तीव्र निषेध करत आहे. देशाच्या सर्वागीण प्रगतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अहोरात्र कार्यरत आहेत. देशाच्या कणखर पंतप्रधानांमुळे जगामध्ये भारत देशाला महत्व वाढले असताना विरोधक मात्र अशा सक्षम नेत्याला विरोध करताना दिसत आहेत. पंतप्रधान हा देशाचा असतो, कोण्या एका पक्षाचा नसतो. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील चुका ही देशाच्या दृष्टीने अत्यंत नामुष्कीची गोष्ट असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत जाणीवपूर्वक त्रुटी ठेवणाऱ्या सर्व संबंधितांवर कडक कारवाई झाली पाहिजे. या घटनेसंदर्भात काँग्रेस नेत्यांनी अतिशय निर्लज्ज प्रतिक्रिया व्यक्त केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस विजय जाधव, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, भाजपा प्रवक्ते अजित ठाणेकर यांनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी सरचिटणीस दिलीप मेत्राणी चंद्रकांत घाटगे, विजय आगरवाल, सचिन तोडकर, किशोरी स्वामी, सुलभा मुजुमदार, प्रमोदिनी हर्डीकर, दिग्विजय कालेकर, अजित सूर्यवंशी, हितेंद्र पटेल, युवा मोर्चा अध्यक्ष विजयसिंह खाडे-पाटील, महिला मोर्चा अध्यक्षा गायत्री राउत, सुनिता सूर्यवंशी, कोमल देसाई, डॉ सदानंद राजवर्धन, आशिष कपडेकर, रविंद्र मुतगी, विवेक कुलकर्णी, भरत काळे, सुधीर देसाई, अशोक लोहार, बापू राणे, अभिजित शिंदे, प्रीतम यादव, विवेक वोरा, गिरीष साळोखे, सिद्धांत भेंडवडे, सुनील पाटील, मानसिंग पाटील, महेश यादव, धीरज पाटील, अप्पा लाडप्रवीण शिंदे, उत्तर भारतीय मोर्चाचे सर्व पदाधिकारी, दिलीप बोंद्रे, दत्ता लोखंडे, मामा कोळवणकर, किशोर जाधव, यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

कृपया प्रसिद्धीसाठी, आपला



मा.संपादकसो, शंतनू मोहिते
दै. भाजपा कार्यालय प्रमुख

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes