Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कागलात राजकीय शत्रू बनले मित्र ! नगरपालिकेसाठी हसन मुश्रीफ-समरजितराजे एकत्र ! !काँग्रेस सोडलेल्या माजी नगरसेवकांना निवडणुकीत धडा शिकवणार - आमदार सतेज पाटील अमूलला टक्कर द्यायचे असेल तर गोकुळचे दूध संकलन वाढवा- मंत्री हसन मुश्रीफशिक्षक बँकेच्या मागील संचालकावरील सहा वर्षे अपात्रतेची कारवाई रद्द, जिल्हा उपनिबंधकांचा आदेशमनपास्तर शालेय क्रिकेट स्पर्धेत विवेकानंद कॉलेजला विजेतेपदनगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे 40 स्टार प्रचारक ! माजी मंत्री आमदार खासदारांचा समावेशहलगर्जीपणा चालणार नाही, वेळेत काम पूर्ण करा- डेडलाईन पाळा- अमल महाडिकांच्या अधिकाऱ्यांना सूचनाभाजपा - नेते कार्यकर्त्यांचा ढोल ताशावर ठेकालंडनमध्ये रंगला माजी विद्यार्थ्यांचा मेळावा, डॉ. संजय पाटील, तेजस पाटलांनी साधला संवादगोकुळमध्ये सहकार सप्‍ताहनिमित्‍त चेअरमनांच्या हस्ते ध्‍वजारोहण

जाहिरात

 

व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीवर आघाडीचा बहिष्कार ! कुलगुरुंच्यावर मनमानी कारभाराचा आरोप !!

schedule18 Jul 24 person by visibility 1024 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ विकास आघाडी आणि विद्यापीठ प्रशासनात अंतर वाढत असल्याचे चित्र आहे. शिवाजी विद्यापीठाच्या, गुरुवारी होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीवर विद्यापीठ विकास आघाडीच्या सदस्यांनी बहिष्कार टाकला. ‘ सदस्यांपासून माहिती लपवणे व मनमानी पद्धतीने बैठक आयोजित करणे यामुळे बहिष्काराचा निर्णय घेतला. या बहिष्कारामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यास फक्त कुलूगुरू यांचा मनमानी कारभार जबाबदार आहे.’ असे आघाडीने आरोप केला आहे.
शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलसचिव डी. व्ही. मुळे यांचे सेवानिवृत्ती वेतन व अन्य लाभासंबंधी  सुप्रींम कोर्टातील केस मागे घेण्यासंबंधी गुरुवारी, १८ जुलै रोजी व्यवस्थापन परिषदेची बैठक आयोजित केली होती. याच विषयावर यापूर्वी 
दोन जुलै २०२४ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये आघाडीच्या सदस्यांनी डॉ. मुळे यांच्या विषयाच्या अनुषंगाने मतदानाचा आग्रह धरला होता. परंतु कुलगुरु शिर्के यांनी  याविषयावर सभागृहात एकमताने निर्णय होऊ दे,  मतदान होवू नये अशी भूमिका मांडली. अखेर या विषयावर १८ जुलै रोजी व्यवस्थान परिषदेची बैठक घेण्याचे ठरले आणि त्या बैठकीत फक्त मुळे यांच्या विषयावर चर्चा होईल असे ठरले होते असे आघाडीचे म्हणणे आहे. 
 विद्यापीठ प्रशासनाने १८ जुलै रोजी व्यवस्थापन परिषदेची बैठक आयोजित केली होती. मात्र या बैठकीच्या अजेंडयावर मुळे यांच्यासह ३६ हून अधिक विषय असल्याचे विद्यापीठ  विकास आघाडीच्या सदस्यांना बारा जुलै रोजी लक्षात आले. विकास आघाडीच्या सदस्यांनी त्याचदिवशी कुलगुरू कार्यालयाच्या निदर्शनास ही बाब आणली. त्यावर कुलगुरू कार्यालयाकडून त्यांना काही उत्तर मिळाले नाही. कुलगुरू कार्यालयकडून विकास आघाडीला, १७ टजुलै रोजी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीला या निर्णय घेऊ असा निरोप केला. दुसरीकडे १८ जुलै रोजी एकाच विषयावर बैठक घेण्याचे ठरले असताना अन्य विषयांचा समावेश का केला ? असा सवाल करत  कुलगुरुंनी दोन जुलै रोजी दिलेला शब् पाळल नाही असा आरोप आघाडीने केला.
दुसरीकडे कुलगुरू यांनी बैठकीच्या अजेंडामध्ये कोणताही बदल केला नाही. आणि १८ जुलै रोजीच्या बैठकीला उपस्थित राहण्याबाबत विकास आघाडीच्या सदस्यांना कळविले. कुलगुरुंकडून विकास आघाडीच्या पत्राची दखल न घेतल्यामुळे  विद्यापीठ विकास आघाडीची गुरुवारी सकाळी बैठक झाली. 
आघाडीचे अध्यक्ष डॉ.संजय.डी.पाटील, उपाध्यक्ष भैय्या माने, प्राचार्य डॉ. डी आर मोरे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. आर. व्ही. शेजवळ, प्राचार्य व्ही. एम. पाटील, प्रा.डॉ. रघुनाथ ढमकले, पृथ्वीराज पाटील, प्रा. डॉ.  वर्षा मैंदर्गी, प्रा. डॉ. जगदीश सपकाळे, अमर रजपूत, स्वागत परुळेकर  उपस्थित होते. कुलगुरुंचा मनमानी पद्धतीने कारभार करण्याच्या पद्धती व सदस्यांच्या अधिकाराचा योग्य सन्मान करत नसल्याचे कारण देत आघाडीच्या बैठकीमध्ये व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय झाला या निर्णयाची माहिती कुलसचिव व्ही. एन. शिंदे यांना कळविले. शिवाय विकास आघाडीचे सदस्य बैठकीला गेले नाहीत. यासंबंधी कुलगुरू व कुलसचिव  यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तो होऊ शकला नाही.
.................................
आघाडीने नोंदविला आक्षेप...
डॉ.मुळे यांच्या विरोधात शिवाजी विद्यापीठाची सुप्रीम कोर्टमध्ये केस सुरू आहे. या केसमध्ये तडजोडीबाबत जिल्हा पातळीवर तडजोड करण्याबाबत सुप्रीम कोर्टातर्फे विद्यापीठास कळविण्यात आले होते. त्यानुसार दोन रोजी व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये विद्यापीठाने आपले म्हणणे मांडण्यासाठी संबंधित न्यायव्यवस्थेकडे तीन आठवड्याचा अवधी मागावा असे ठरले होते. परंतु तीन आठवड्याचा अवधी देण्यास  न्यायव्यवस्थेने नकार दिला.
तसे विद्यापीठास पाच जुलै रोजी कळविले होते. परंतु विद्यापीठाने ही माहिती व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांपासून लपवून ठेवली. अकरा जुलैपर्यंत तडजोडीबाबतच्या निर्णयासंबंधी  न्याय व्यवस्थेने विद्यापीठास कळवले होते त्यामुळे त्याबाबत व्यवस्थापन परिषदेची तातडीची बैठक आयोजित करणे आवश्यक होते. पण तसे न करता कुलगुरू यांनी १८ जुलै रोजी नियमित स्वरूपाची बैठक आयोजित केली .त्यामुळे आघाडीच्या सदस्यांमध्ये असंतोषाची भावना आहे. 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes