+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustआपली उमेदवारी फाइनल, शिवसेनेतर्फे २८ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार-राजेश क्षीरसागर adjustजीएसटी अधिकाऱ्याला २५ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले adjustउत्तम संवाद कौशल्य म्हणजे उत्तम करिअरची संधी- डॉ विश्वनाथ मगदूम adjustजिल्ह्यातील हॉटेल, बार, दारु दुकाने रात्री अकरानंतर बंद ! जिल्हा प्रशासनाचा आदेश adjustप्रत्येक निवडणुकीत कोल्हापूर दक्षिणमध्ये मतदानाचा चढता आलेख ! नवीन २६ मतदान केंद्रे !! adjustइचलकरंजी भाजपा कार्यालयात आवाडेंचे उत्साही स्वागत ! शशिकला जोल्ले, सुरेश हाळवणकरांनी केले स्वागत !! adjustजिल्हा परिषद कर्मचारी महासंघातर्फे आढावा बैठक adjustकरवीर तालुका शिक्षक-शिक्षकेतर पतसंस्थेतर्फे सभासदांना दीपावली भेट वस्तू वाटप adjustकोल्हापूर दक्षिणची जनता माझ्यासोबत ! निवडणुकीत नक्की पाठीशी राहील !! अमल महाडिक adjustजनसुराज्य जिल्ह्यात तीन जागा लढणार, उमेदवारही निश्चित
1001157259
1001130166
1000995296
schedule22 Jun 24 person by visibility 223 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर - "राजर्षी शाहूंची वाङ्मयीन स्मारके" हा ग्रंथ सध्याच्या सांस्कृतिक दहशतवादाला उत्तर देण्यास उपयुक्त ठरणारा आहे. राजर्षी शाहू महाराज प्रागतिक विचारांचे होते, त्यांच्या विचारांची पॉवर धगधगती ठेवण्याचे काम हा ग्रंथ करीत आहे,” असे मत श्री शिव-शाहू महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख प्रा. प्रकाश नाईक यांनी केले. 
कोतोली येथील श्रीपतराव चौगुले आर्ट्स अॅण्ड सायन्स कॉलेजच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, संशोधन समिती व राजर्षी शाहू अध्यासन, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहू शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त  डॉ. जे. के. पवार लिखित "राजर्षी शाहूंची वाड्.मयीन स्मारके" या ग्रंथावर  चर्चासत्र आयोजित केले होते. याप्रसंगी प्ना. नाईक बोलत होते. माजी प्राचार्य डॉ. जे. के. पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. संस्था सचिव शिवाजीराव पाटील, प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, संचालक डॉ.अजय चौगुले उपस्थित होते.
राजर्षी शाहूंची वाड्.मयीन स्मारके या ग्रंथावर  प्रा. डॉ. बी. एन. रावण, डॉ. एस. एस. कुरलीकर, प्रा. पी. डी. माने यांनी मनोगते व्यक्त केली.   कॉलेजचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. उमा पाटील यांनी पाहुण्यांची ओळख करुन दिली. डॉ. यू. एन. लाड यांनी आभार मानले.  डॉ. एम. के. कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.