+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule29 Feb 24 person by visibility 251 categoryराजकीय
राजकारणात यावं की नाही हा शाहू महाराजांचा व्यक्तिगत प्रश्न
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी राजकारणात यावं की नाही हा त्यांचा व्यक्तीगत प्रश्न आहे. मात्र ते, साऱ्यांसाठी आदर्श आहेत. आदर्श व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. यामुळे त्यांनी निवडणुकीस उभे राहू नये.’ असे मत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. त्याचवेळी मुश्रीफ यांनी, महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी करू असे सांगितले.
सध्या कोल्हापूर लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांचे नाव आघाडीवर आहे. दुसरीकडे महायुतीकडून अद्याप उमेदवारांची घोषणा झाली नाही. महायुतीकडून शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना उमेदवारी मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. मंडलिक यांनी मतदारांशी संपर्क सुरू केला आहे.
पालकमंत्री मुश्रीफ हे गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले असता एका कार्यक्रमादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी श्रीमंत शाहू महाराज यांचे नाव महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकीसाठी चर्चेत आहे यासंबंधी मुश्रीफ यांना विचारला असते, श्रीमंत शाहू महाराज हे आदर्श व्यक्तिमत्व आहे. त्यांनी निवडणुकीपासून लांब राहावे असे वाटते. पण त्यांनी राजकारणात यावे की नाही हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. तेच जर राजकारणात येत असतील तर यापुढे लोक ठरवतील असे मत त्यांनी व्यक्त केले. कोल्हापुरातील दोन्ही जागा शिवसेना शिंदे गटाला मिळण्याची शक्यताही मुश्रीफ यांनी बोलून दाखविली.