Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसने आता कौशल्य विकास विद्यापीठाकडे वाटचाल करावी - डॉ. सुनीलकुमार लवटेशाळा गुणवत्ता मूल्यांकन- आश्वासन आराखडामध्ये स्वयं मूल्यांकन प्रक्रियेत कोल्हापूर राज्यात तृतीय क्रमांकावरकोल्हापूर शहरातील समस्या दूर करण्याला प्राधान्य द्या- आमदार अमल महाडिकराज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा एक जूनपासून मोफत : परिवहनमंत्री प्रताप सरनाईक विद्यार्थीप्रिय शिक्षक ! उत्तम वाचक - वक्ते अन् प्रगतशील शेतकरीही !!बाजार समिती एक सचिव दोन, शासकीय सचिव नियुक्तीविरोधात वळंजूची तक्रारबाजार समिती सभापती नानासो कांबळे यांचा कार्यालयीन प्रवेशसमूह विद्यापीठांनी मानांकन उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहावे: कुलपती जिष्णू देव वर्मागोकुळमध्ये शह-काटशहाचे राजकारण! आमदारांची तक्रार, दोन दिवसात सहाय्यक निबंधकांची बदली शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखा वगळून जनगणना प्रशिक्षण आयोजित करा - भरत रसाळे

जाहिरात

 

राजू शेट्टींचा मुश्रीफ, यड्रावकरांना खडा सवाल, सरकारकडून एफआरपीची मोडताना होताना गप्प का होता ?

schedule17 Sep 22 person by visibility 394 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
यंदा उसाची एफआरपी एकरकमी तर घेऊच उसाला दर किती घ्यायचे ते आम्ही १५ ऑक्टोबरच्या ऊस परिषदेत ठरवू. एफआरपी द्यायचीच होती तर महाविकास आघाडी सरकारने एफआरपीची मोडतोड करण्याचा बेकायदेशीर कायदा केला, त्यावेळी माजी मंत्री हसन मुश्रीफ व आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे गप्प का बसले, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला. 
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील साखर कारखाने यंदा एकरकमी एफआरपी देतील, असे सुतोवाच केले. बँकेचे संचालक आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी उसाच्या गाडीचे टायर न फोडण्याचा अनाहूत सल्ला देखील दिला.यावर राजू शेट्टी पत्रक काढून त्या दोन्ही नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. शेट्टी यांनी पत्ररकात कम्हटले आहे, शेतकरी काय गंमत म्हणून टायरी फोडत नाही. ज्यावेळी साखर कारखानदारांकडून शेतकर्यांची पिळवणूक होते व त्याला रस्त्यावर यायला भाग पाडतात, त्यावेळी त्याच्याकडून घडलेली ही प्रतिक्रिया असते. विधीमंडळामध्ये एफआरपीचे तुकडे करण्याचा बेकायदेशीरपणे कायदा मंजूर केला, त्यावेळी हे दोघे मंत्री तोंड मिटून गप्प का बसले, या प्रश्नाचे उत्तर शेतकरी मागत आहेत. एका बाजूला एफआरपीचे तुकडे करण्याचा कायदा केला तर दुसरीकडे शेतकर्यांच्या संघटीत शक्तीपुढे लोटांगण घालून एफआरपी देण्याची तयारी दाखवायची, तुम्ही असले धंदे बंद करा. गेल्यावर्षी तुटलेल्या उसाला एफआरपी सोडून अधिक दोनशे रूपये द्यावे लागतील. इथेनॉल मधून चांगला पैसा मिळालेला आहे. साखरेला दर चांगला मिळाला आहे. एफआरपी पेक्षा जास्त किती देताय ते सांगा मग आम्ही ऊस परिषदेत ठरवू, उसाला किती दर घ्यायचे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes