Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
डॉ. संजय डी. पाटील यांचा द कॅप्टन्स व्हिजन अवॉर्डने सन्मानसंजय भोसले, दिवाकर कारंडे पुन्हा महापालिकेत कामावर रुजूवाढदिवसाला अनोखा उपक्रम, बालकल्याण संकुलातील मुलांसाठी खास शोजिल्हा परिषदेतर्फे दर शुक्रवारी सायकल डे, पदाधिकारीही करणार बसने प्रवाससामान्य माणसांनी प्रवास - खर्च कमी करायचा, भाजपचे मंत्री - नेते काय त्याग करणार ? काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा सवालशुक्रवारपासून तीन दिवसीय परिस सेंद्रिय खत महोत्सव मोटेवाडी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत, जखमींच्या उपचाराचा खर्चही सरकार करणारजनगणना कामात सहभागी शिक्षकांना बदली  रजा मंजूर करावीई चलन दंड माफीचा सरकारला विसर, कोल्हापुरात प्रदीप राठोंडाचे आमरण उपोषणमहापालिकेच्या मालकीची २१ कोटीची जागा विनावापर पडून ! विजय जाधवांनी वेधले आयुक्तांचे लक्ष!!

जाहिरात

 

राजू शेट्टींचा मुश्रीफ, यड्रावकरांना खडा सवाल, सरकारकडून एफआरपीची मोडताना होताना गप्प का होता ?

schedule17 Sep 22 person by visibility 418 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
यंदा उसाची एफआरपी एकरकमी तर घेऊच उसाला दर किती घ्यायचे ते आम्ही १५ ऑक्टोबरच्या ऊस परिषदेत ठरवू. एफआरपी द्यायचीच होती तर महाविकास आघाडी सरकारने एफआरपीची मोडतोड करण्याचा बेकायदेशीर कायदा केला, त्यावेळी माजी मंत्री हसन मुश्रीफ व आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे गप्प का बसले, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला. 
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील साखर कारखाने यंदा एकरकमी एफआरपी देतील, असे सुतोवाच केले. बँकेचे संचालक आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी उसाच्या गाडीचे टायर न फोडण्याचा अनाहूत सल्ला देखील दिला.यावर राजू शेट्टी पत्रक काढून त्या दोन्ही नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. शेट्टी यांनी पत्ररकात कम्हटले आहे, शेतकरी काय गंमत म्हणून टायरी फोडत नाही. ज्यावेळी साखर कारखानदारांकडून शेतकर्यांची पिळवणूक होते व त्याला रस्त्यावर यायला भाग पाडतात, त्यावेळी त्याच्याकडून घडलेली ही प्रतिक्रिया असते. विधीमंडळामध्ये एफआरपीचे तुकडे करण्याचा बेकायदेशीरपणे कायदा मंजूर केला, त्यावेळी हे दोघे मंत्री तोंड मिटून गप्प का बसले, या प्रश्नाचे उत्तर शेतकरी मागत आहेत. एका बाजूला एफआरपीचे तुकडे करण्याचा कायदा केला तर दुसरीकडे शेतकर्यांच्या संघटीत शक्तीपुढे लोटांगण घालून एफआरपी देण्याची तयारी दाखवायची, तुम्ही असले धंदे बंद करा. गेल्यावर्षी तुटलेल्या उसाला एफआरपी सोडून अधिक दोनशे रूपये द्यावे लागतील. इथेनॉल मधून चांगला पैसा मिळालेला आहे. साखरेला दर चांगला मिळाला आहे. एफआरपी पेक्षा जास्त किती देताय ते सांगा मग आम्ही ऊस परिषदेत ठरवू, उसाला किती दर घ्यायचे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes