Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
केआयटीमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजराशाहूवाडीत बिबटयाचा हल्ला, वृद्ध दाम्पत्यांचा मृत्यूसेंट्रल रेल्वेच्या विभागीय प्रवासी सल्लागार समिती सदस्यपदी आनंद मानेउद्योन्मुख खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी ब्रँड कोल्हापूरने निधी उभारावा-यशवंतराव थोरातगोकुळच्या व्यासपीठावरून काँग्रेसच्या आमदारांची मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये महायुती सरकारवर टीकास्त्र, हा विषय न समजण्यासारखाथेट पाईपलाईनचे श्रेय घेता मग जबाबदारी का झटकता ? राजेश क्षीरसागरांचा सतेज पाटलांना पलटवारआता चौथी-सातवीच्या वर्गासाठी शिष्यवृत्ती परीक्षा ! एकवेळची बाब म्हणून फेब्रुवारीत पाचवी-आठवीची परीक्षा !शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय महिला बास्केटाबॉलल स्पर्धेत तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी मुलींच्या संघास विजेतेपदसावित्रीबाई फुले रुग्णालयातील अतिदक्षता विभाग नऊ दिवस बंदनोव्हेंबर महिन्यापासून मुख्यमंत्री माझी शाळा - सुंदर शाळा टप्पा तीन अभियान

जाहिरात

 

कलायोगी जी. कांबळे यांना मरणोत्तर ‘महाराष्ट्र भूषण’पुरस्कारांनी सन्मानित करा, खाटिक समाजाची राज्य सरकारकडे मागणी

schedule28 Jul 20 person by visibility 3265 categoryसंपादकीय

 महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय किर्तीचे चित्रकार कलायोगी जी. कांबळे यांना मरणोत्तर ‘महाराष्ट्र भूषण’पुरस्कार देऊन त्यांच्या कलेला सन्मानित करावे अशी मागणी खाटिक समाजाने केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पालकमंत्री सतेज पाटील यांना ईमेलद्वारे या मागण्यांचे निवेदन पाठविले आहे.

सिनेमा पोस्टरच्या दुनियेतील सम्राट म्हणून जी. कांबळे यांची ओळख आहे. भारतीय सिनेमा पोस्टरमध्ये जी कलात्मकता व भव्यता दिसते त्याचा पाया कलायोगींनी घातला. दिल्लीत १९६० मध्ये ‘मुगले आझम’सिनेमाची जी. कांबळे यांनी रेखाटलेली भव्य पोस्टर पेटिंग पाहून इंग्लडच्या राणी एलिझाबेथ यांनी आपल्या स्वागताची मिरवणूक काही वेळ थांबवली होती. पोस्टर पेटिंग पाहून त्या इतक्या प्रभावित झाल्या होत्या. कलायोगी जी कांबळे यांनी पोस्टर पेंटिगला अभिजात कलेसारखा दर्जा मिळवून दिला. त्यांनी महापुरुषांची व्यक्तीचित्रे रेखाटली. सतत पाच वर्षे अभ्यासपूर्वक बनविलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्राला सरकारची अधिकृत चित्र म्हणून राज्यमान्यता मिळाली.

कलायोगी जी. कांबळे यांच्या कलेची क्षेत्रातील कामगिरीचा गौरव म्हणून राज्य सरकारने त्यांना मरणोत्तर ‘महाराष्ट्र भूषण’पुरस्कार देऊन सन्मानित करावे अशी मागणी समाजाने केली आहे. खाटिक समाज कोल्हापूरचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव, सचिव संजय भोपळे, अखिल भारतीय खाटिक समाज कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष विजय कांबळे यांनी या मागणीचे निवेदन मेल केले आहे.


जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes