Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळमध्ये महायुतीचा दोन हजाराहून अधिक मतांनी विजय, ठरावधारकांनी सहलीवर जायची तयारी ठेवावी - हसन मुश्रीफश्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त गोकुळ शॉपीचे उद्घाटन‘टाइम टू मार्केट’ साधणाराच खरा उद्योजक, ग्रीन हायड्रोजनमध्ये मोठी संधी : कुलगुरू डॉ. राजनीश कामतराजू शेट्टी हे स्टंटबाज आंदोलक, सतेज पाटलांनी माझ्या मंत्रीपदाची काळजी करू नये - आमदार राजेश क्षीरसागरमहाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघातर्फे धरणे आंदोलनजिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातर्फे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीरशक्तीपीठ महामार्गावरुन राजू शेट्टी -राजेश क्षीरसागर समर्थक भिडले रस्त्यावरविज्ञानाच्या जगाची विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभूती, शहीद पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची रिसर्च सेंटरला भेटशिक्षणाधिकारी मीना शेंडकरांच्याकडून सात प्रकरणात कर्तव्यात कसूर, पदस्थापनेत प्रशासकीय अनियमितता ! चौकशी अहवालात ठपका ! !शिक्षणाधिकारी मीना शेंडकरांना कारणे दाखवा नोटीस, खुलासा करण्यास सात दिवसाचा अवधी

जाहिरात

 

गोकुळमध्ये महायुतीचा दोन हजाराहून अधिक मतांनी विजय, ठरावधारकांनी सहलीवर जायची तयारी ठेवावी - हसन मुश्रीफ

schedule04 Sep 26 person by visibility 31 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘कुणी काहीही म्हणू देत गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीच्या पॅनेलचा दोन हजारांहून अधिक मताधिक्याने दणदणीत विजय होईल. दसऱ्याच्या आधीपासूनच गोकुळच्या ठरावधारकांनी सहलीवर जायची तयारी ठेवा. केडीसीसी बँकेच्या ठरावधारकांनीही वेळेवर ठराव दाखल करावेत’ असा विश्वास वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. ​            
कागलमध्ये मतदार याद्यांचे पुनरीक्षण, गोकुळ दूध संघ निवडणूक, केडीसीसी बँक निवडणूक या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या नियोजनाच्या बैठकीत मंत्री मुश्रीफ बोलत होते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘मी सातत्याने सांगत होतो की आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत. महायुतीचाच विजय होऊन महायुतीचीच सत्ता येणार आहे. असे असतानाही एवढा त्रास का झाला, याचे उत्तर आजही अनाकलनीयच आहे. आज सगळ्याच गोष्टी मी बोलणार नाही.सत्याच्या या लढ्यामध्ये सबंध कोल्हापूर जिल्ह्यातून राष्ट्रवादीसह शिवसेना शिंदे गट, जनसुराज्य पक्ष या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि प्रमुखांनी भरभरून साथ आणि पाठबळ दिले. किंबहुना; संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यानेच या लढ्याला पाठिंबा दिला. त्यामुळेच हा लढा जिंकता आला. 

भाषणात मुश्रीफ यांनी, शेरोशायरी केली. "सच को दबाने की कोशिशें हजार हों फिर भी सच कभी हारता नहीं," "वक्त का फैसला जब होता है तो विजय सत्य की होती है. " झूठ का शोर चाहे जितना भी हो, जीत हमेशा सच की होगी।"हे शेर ऐकविले. केडीसीसी बँकेचे संचालक भैया माने यांनी प्रास्ताविक केले. व्यासपीठावर पंचायत समितीचे उपसभापती डॉ. इंद्रजित पाटील, मुरगूडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार, गडहिंग्लजचे प्रभारी नगराध्यक्ष महेश सलवादे, माजी नगराध्यक्ष राजू खनगावे, बिद्रीसाखरचे संचालक पैलवान रवींद्र पाटील- बानगेकर, बिद्रीसाखरचे संचालक सुनीलराज सूर्यवंशी, बिद्री साखरचे संचालक आर. व्ही. पाटील- सुरुपलीकर, माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब तुरंबे, देवानंद पाटील, संजय चितारी, सुनील दिवटे, राजेंद्र माने, दत्ता पाटील- केनवडेकर, प्रवीण काळबर, रश्मीराज देसाई, अमर सनगर आदी प्रमुख उपस्थित होते. निढोरीचे माजी सरपंच देवानंद पाटील यांनी स्वागत केले. राष्ट्रवादीचे कागल शहराध्यक्ष संजय चितारी यांनी आभार मानले.


 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes