Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळमध्ये आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन साजराकोल्हापुरात डेप्युटी सीईओ, बीडीओसह २९ अधिकारी सामूहिक रजेवरलिंगायत माळी समाजाचे पुरस्कार जाहीर ! एस. एम. माळींना जीवनगौरव, अशोक राजाराम माळींना समाजभूषण पुरस्कार ! !दिव्यांग दिन ठरला अनोखा, अंध शिक्षिका दिपाली पाटीलला नियुकतीचे पत्रशाळा बंद आंदोलनातील शिक्षक – कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात : शिक्ष्ण संचालकांचा आदेशमतदार कोल्हापूरचे, नाव पुणे-बार्शीच्या मतदार यादीत, हा घोळ कधी सुधारणार ? : आदिल फरासांचा प्रशासनाला सवालमहापालिकेतील भ्रष्ट यंत्रणेचे राजेश क्षीरसागर हेच सूत्रधार – राजेश लाटकरांचा हल्लाबोलशिष्यवृत्ती परीक्षा 22 फेब्रुवारीला ! केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा आठ फेब्रुवारीला !!मुकुंदराव पाटील पत्रकारिता -साहित्य पुरस्कर जाहीर ! विश्वास पाटील, रवींद्र गुरव, धनाजी घोरपडे, सचिन पाटलांचा समावेश ! !विद्यापीठातील विभागात पूजाअर्चा, विरोध केल्यानंतर प्रकुलगुरुंची दिलगिरी

जाहिरात

 

जिल्हयात आजपासून स्वच्छता ही सेवा अभियान : संजयसिंह चव्हाण

schedule15 Sep 22 person by visibility 505 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्ह्यात १५ सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर २०२२ या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविण्यात येणार आहे.’ यावर्षी स्वच्छता ही सेवा अभियानात गावांची स्वच्छता ही संकल्पना घेउन हे अभियान होणार आहे.’अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्म दिनानिमित्त १५ ते १७ सप्टेंबर या कालावधीत महाश्रमदानाव्दारे कचरा, विशेषत : प्लास्टीक कचरा संकलन व व्यवस्थापन करण्याचे नियोजित केले आहे. लोकसहभागाद्वारे ह मोहीम यशस्वी करावी. आरोग्य संपन्न गावे निर्माण व्हावी यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार, ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान अंतर्गत विविध उपक्रम होणार आहेत.
२६ सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या कालावधीत रेल्वे स्थानके, बाजारपेठा, शासकीय दवाखाने, ग्रामपंचायत कार्यालये, मंदिर व मंदिर परिसर, समाज मंदिरे, शाळा, अंगणवाडी येथे स्वच्छता कार्यक्रम होतील. 2 ऑक्टोंबर रोजी ग्रामपंचायती हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस ) घोषित करणे, ग्रामसभेमध्ये एकदाच वापरावयाचे प्लास्टीक बंदी बाबत ठराव असे उपक्रम होतील.
  या अभियानात लोकप्रतिनिधी, गावातील सरपंच, सदस्य, गावातील समाजसेवी संस्था व ग्रामस्थांनी सहभागी होवून स्वच्छता ही सेवा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी. असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes