Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
अपक्ष उमेदवार संग्राम भालकरांचा सभासद  संपर्कावर भरश्री रवळनाथ को - ऑप हौसिंग फायनान्सच्या कोल्हापूर शाखेचा सोमवारी वर्धापनदिन, शंभर कोटी ठेवीबद्दल आनंद सोहळाअखिल भारतीय महापौर परिषदेच्या कार्यकारिणीवर महापौर रुपाराणी निकम यांची नियुक्तीपालकमंत्री लक्ष देणार का ? सहा महिने पगार थकीत… जिल्हा परिषदेतील जलजीवनमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना वाली कोण !महापालिकेत महायुतीत मानापमान नाट्य, कार्यालय प्रवेश कार्यक्रमापासून शिवसेना नगरसेवक चार हात लांबसभागृह नेता, स्थायी समिती सभापतींचा कार्यालयीन प्रवेशईएसआय रुग्णालय - ओपीडीमधील समस्या तातडीने सोडवा : कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनची मागणीकोरे अभियांत्रिकीत सहाशेहून अधिक विद्यार्थ्यांची विविध कंपन्यात निवडप्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरण संवर्धनाला हातभार लावू या : अध्यक्षा शिल्पा खोत कलाकार - कामगारांचे स्वप्नं साकारण्यासाठी…वडिलांची ईच्छा पूर्ण करण्यासाठी महामंडळाच्या निवडणुकीत - संग्राम भालकर

जाहिरात

 

जिल्हयात आजपासून स्वच्छता ही सेवा अभियान : संजयसिंह चव्हाण

schedule15 Sep 22 person by visibility 563 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्ह्यात १५ सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर २०२२ या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविण्यात येणार आहे.’ यावर्षी स्वच्छता ही सेवा अभियानात गावांची स्वच्छता ही संकल्पना घेउन हे अभियान होणार आहे.’अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्म दिनानिमित्त १५ ते १७ सप्टेंबर या कालावधीत महाश्रमदानाव्दारे कचरा, विशेषत : प्लास्टीक कचरा संकलन व व्यवस्थापन करण्याचे नियोजित केले आहे. लोकसहभागाद्वारे ह मोहीम यशस्वी करावी. आरोग्य संपन्न गावे निर्माण व्हावी यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार, ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान अंतर्गत विविध उपक्रम होणार आहेत.
२६ सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या कालावधीत रेल्वे स्थानके, बाजारपेठा, शासकीय दवाखाने, ग्रामपंचायत कार्यालये, मंदिर व मंदिर परिसर, समाज मंदिरे, शाळा, अंगणवाडी येथे स्वच्छता कार्यक्रम होतील. 2 ऑक्टोंबर रोजी ग्रामपंचायती हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस ) घोषित करणे, ग्रामसभेमध्ये एकदाच वापरावयाचे प्लास्टीक बंदी बाबत ठराव असे उपक्रम होतील.
  या अभियानात लोकप्रतिनिधी, गावातील सरपंच, सदस्य, गावातील समाजसेवी संस्था व ग्रामस्थांनी सहभागी होवून स्वच्छता ही सेवा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी. असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes