Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूरच्या विकासाचा बनणार ॲक्शन प्लॅन : मंत्री, आमदारांच्या उपस्थितीमध्ये २८ विषयावर चर्चादूध संस्थांच्या सुनावण्या तातडीने पूर्ण करा, संस्था प्रतिनिधी धडकले सहायक निबंधक कार्यालयावर जिल्हा परिषदेत बिल मंजुरीतील टेबल कमी होणार, बांधकाम विभागाचा निर्णय : सभापती सारिका नांदेकरजिल्हा परिषदेचे पदाधिकारी घेणार तालुकास्तरीय आढावा बैठक, जनता दरबार भरवणार दिवाळीनंतर नागपूर, गोवा, दिल्ली, राजस्थान अन् गुजरातसाठी विमानसेवा - धनंजय महाडिकशाहूवाडीच्या एमआयडीतील गुंतवणुकीसाठी आमदार विनय कोरेंनी घातली कोल्हापुरातील उद्योजकांना सादडीवाय पाटील अभिमत विद्यापीठ देशात नवव्या ! राज्यात तिसऱ्या स्थानी,नवी दिल्लीत सन्मान !!कृष्णराज महाडिक यांच्या युवाशक्ती जागर यात्रेचे सिंधुदुर्गमध्ये जल्लोषी स्वागतन्यू कॉलेजची विद्यार्थिनी श्रेया गुरवला तीस हजाराची शिष्यवृत्तीन्याय- बंधुता - समता या त्रिसूत्रीवर काम करणार - जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड

जाहिरात

 

कलायोगी जी. कांबळे यांना मरणोत्तर ‘महाराष्ट्र भूषण’पुरस्कारांनी सन्मानित करा, खाटिक समाजाची राज्य सरकारकडे मागणी

schedule28 Jul 20 person by visibility 3631 categoryसंपादकीय

 महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय किर्तीचे चित्रकार कलायोगी जी. कांबळे यांना मरणोत्तर ‘महाराष्ट्र भूषण’पुरस्कार देऊन त्यांच्या कलेला सन्मानित करावे अशी मागणी खाटिक समाजाने केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पालकमंत्री सतेज पाटील यांना ईमेलद्वारे या मागण्यांचे निवेदन पाठविले आहे.

सिनेमा पोस्टरच्या दुनियेतील सम्राट म्हणून जी. कांबळे यांची ओळख आहे. भारतीय सिनेमा पोस्टरमध्ये जी कलात्मकता व भव्यता दिसते त्याचा पाया कलायोगींनी घातला. दिल्लीत १९६० मध्ये ‘मुगले आझम’सिनेमाची जी. कांबळे यांनी रेखाटलेली भव्य पोस्टर पेटिंग पाहून इंग्लडच्या राणी एलिझाबेथ यांनी आपल्या स्वागताची मिरवणूक काही वेळ थांबवली होती. पोस्टर पेटिंग पाहून त्या इतक्या प्रभावित झाल्या होत्या. कलायोगी जी कांबळे यांनी पोस्टर पेंटिगला अभिजात कलेसारखा दर्जा मिळवून दिला. त्यांनी महापुरुषांची व्यक्तीचित्रे रेखाटली. सतत पाच वर्षे अभ्यासपूर्वक बनविलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्राला सरकारची अधिकृत चित्र म्हणून राज्यमान्यता मिळाली.

कलायोगी जी. कांबळे यांच्या कलेची क्षेत्रातील कामगिरीचा गौरव म्हणून राज्य सरकारने त्यांना मरणोत्तर ‘महाराष्ट्र भूषण’पुरस्कार देऊन सन्मानित करावे अशी मागणी समाजाने केली आहे. खाटिक समाज कोल्हापूरचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव, सचिव संजय भोपळे, अखिल भारतीय खाटिक समाज कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष विजय कांबळे यांनी या मागणीचे निवेदन मेल केले आहे.


जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes