Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
वारी आनंदाची ! कोल्हापूर जिल्हा परिषदेची हमी शुद्ध पाणी पुरवठ्याची !!अमर रहे अमर रहे - लाटकर काका अमर रहे ! राष्ट्र सेवादलाकडून मानवंदना, शोकाकूल वातावरणात भरत लाटकरांना अखेरचा निरोप  कार्यरत शिक्षकांसाठी स्वतंत्र टीईटीचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन ! तर सेवाज्येष्ठ शिक्षक पदोन्नतीस पात्र !! राष्ट्रसेवा दलाचे माजी अध्यक्ष भरत लाटकर यांचे निधनउपकुलसचिव निवास माने यांना पीएचडीमहापालिकेच्या हद्दवाढीत सहभागी व्हा, तुमची सर्व जबाबदारी घेऊ - महापौर रुपाराणी निकमगोकुळसाठी मुख्यमंत्री सांगतील तसे महायुतीचे पॅनेल – मंत्री हसन मुश्रीफपदोन्नती प्रक्रियेतील अनियमितता - गैरप्रकारची चौकशी होणार - मंत्री हसन मुश्रीफजिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग हा जिल्ह्याचा आत्मा - पालकमंत्री प्रकाश आबिटकर महापालिकेतील समित्यांच्या सभापती उपसभापती निवडीतही रंगले नाट्य ! समान मतामुळे क्रीडा समिती पदाधिकारी निकाल चिठ्ठीद्वारे ! !

जाहिरात

 

कलायोगी जी. कांबळे यांना मरणोत्तर ‘महाराष्ट्र भूषण’पुरस्कारांनी सन्मानित करा, खाटिक समाजाची राज्य सरकारकडे मागणी

schedule28 Jul 20 person by visibility 3757 categoryसंपादकीय

 महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय किर्तीचे चित्रकार कलायोगी जी. कांबळे यांना मरणोत्तर ‘महाराष्ट्र भूषण’पुरस्कार देऊन त्यांच्या कलेला सन्मानित करावे अशी मागणी खाटिक समाजाने केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पालकमंत्री सतेज पाटील यांना ईमेलद्वारे या मागण्यांचे निवेदन पाठविले आहे.

सिनेमा पोस्टरच्या दुनियेतील सम्राट म्हणून जी. कांबळे यांची ओळख आहे. भारतीय सिनेमा पोस्टरमध्ये जी कलात्मकता व भव्यता दिसते त्याचा पाया कलायोगींनी घातला. दिल्लीत १९६० मध्ये ‘मुगले आझम’सिनेमाची जी. कांबळे यांनी रेखाटलेली भव्य पोस्टर पेटिंग पाहून इंग्लडच्या राणी एलिझाबेथ यांनी आपल्या स्वागताची मिरवणूक काही वेळ थांबवली होती. पोस्टर पेटिंग पाहून त्या इतक्या प्रभावित झाल्या होत्या. कलायोगी जी कांबळे यांनी पोस्टर पेंटिगला अभिजात कलेसारखा दर्जा मिळवून दिला. त्यांनी महापुरुषांची व्यक्तीचित्रे रेखाटली. सतत पाच वर्षे अभ्यासपूर्वक बनविलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्राला सरकारची अधिकृत चित्र म्हणून राज्यमान्यता मिळाली.

कलायोगी जी. कांबळे यांच्या कलेची क्षेत्रातील कामगिरीचा गौरव म्हणून राज्य सरकारने त्यांना मरणोत्तर ‘महाराष्ट्र भूषण’पुरस्कार देऊन सन्मानित करावे अशी मागणी समाजाने केली आहे. खाटिक समाज कोल्हापूरचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव, सचिव संजय भोपळे, अखिल भारतीय खाटिक समाज कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष विजय कांबळे यांनी या मागणीचे निवेदन मेल केले आहे.


जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes