Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेला प्रारंभपत्रकार विजय चोरमारे यांना भाई माधवराव बागल पुरस्कार, २८ मे रोजी वितरण समारंभडॉ. आर. के. कामत शिवाजी विद्यापीठाचे नवीन कुलगुरू शहरातील विद्युत दिव्यांचा विषय अंधातरीच…ईईएसएल कंपनीसोबतचा करार महापालिकेकडून रद्द, नवीन कंपनीचा प्रस्ताव सभागृहाने फेटाळलाशिक्षकेतर कर्मचारी समायोजन  विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करणार : राजेंद्र कोरे प्रा. श्रुती जोशी यांची इचलकरंजीत प्रभारी प्राचार्यपदी नियुक्ती शिक्षक बँकेच्या लवकरच पाच शाखांचा विस्तार, मुख्यालयासमोरील अतिक्रमणे हटवून सभासदांसाठी आरक्षित पार्किंगशहर काँग्रेसमध्ये फेरबदल, सचिन चव्हाणांना हटविले, प्रवीण केसरकर नवे शहराध्यक्ष !जिल्हाध्यक्षपदी सतेज पाटील ! !डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेसाठी डॉ. बापूजी साळुंखे पॉलिटेक्निकमध्ये सुविधा केंद्रऔषध विक्रेत्यांचा बंद, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

जाहिरात

 

रमाईच्या त्यागामुळेच सारा समाज आनंदात- डॉ. प्रवीण कोडोलीकर

schedule07 Feb 25 person by visibility 859 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘विश्वरत्न डॉ  बाबासाहेब आंबेडकर यांनी मानव जातीला आदर्श निर्माण करून दिला. त्यांच्या पत्नी रमाई आंबेडकर यांनी सुद्धा त्यासाठी खूप मोठा त्याग केला आहे; त्यामुळेच सारा समाज संविधानाच्या माध्यमातून आनंदात आहे,’ असे प्रतिपादन आजी-माजी विद्यार्थी संघटना शिवाजी विद्यापीठाचे डॉ. प्रवीण कोडोलीकर यांनी केले.
विचारे माळे येथे निळा रक्षकतर्फे रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी डॉ. कोडोलीकर बोलत होते. याप्रसंगी ते म्हणाले, ‘एखादे चांगले कार्य करायचे असेल तर त्यासाठी पत्नीचा त्याग सुद्धा महत्त्वाचा असतो. रमाई यांनी अनेक हालअपेष्टा सहन करत बाबासाहेब यांना कायमच पाठिंबा देण्याचं काम केलं त्यांचा त्याग समाज कधीच विसरणार नाही.’ कार्यक्रमाला  अनिल भोसले, अनिल माने, विराज सुतार, राहुल शिंदे,  नितिन शिंदे, निलेश शिंदे, रोहन वाघमारे, सतिश साळवे, राजू भंडारे आदी  उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes