Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
आमदार राजेश क्षीरसागरांच्या प्रयत्नांनी शिवसेनेतील बंडखोरी शमली कोल्हापुरात 495 अर्ज मागे ! 325 उमेदवार रिंगणात !!डीवाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला क्युएस आय-गेज इन्स्टिट्यूट ऑफ हॅपिनेस पुरस्कारयोगिता कोडोलीकर, मायादेवी भंडारे यांची माघार चौथी - सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा 26 एप्रिलला भाजपतर्फे जिल्हा परिषद- पंचायत समितीसाठी सोमवारपासून मुलाखती प्रभाग बारामधून जितू सलगरची माघार, महायुतीला पाठिंबा राजकारणात कदमांच्या तिसऱ्या पिढीचे पाऊल, स्वरुप ठरतोय आश्वासक चेहराव्हिजन मॉडर्न प्रभागाचे…स्मार्ट कोल्हापूरचे ! हटके काम, स्मार्ट प्रभाग ! नकातेंचा विकासकामांचा धडाका ! !

जाहिरात

 

रमाईच्या त्यागामुळेच सारा समाज आनंदात- डॉ. प्रवीण कोडोलीकर

schedule07 Feb 25 person by visibility 593 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘विश्वरत्न डॉ  बाबासाहेब आंबेडकर यांनी मानव जातीला आदर्श निर्माण करून दिला. त्यांच्या पत्नी रमाई आंबेडकर यांनी सुद्धा त्यासाठी खूप मोठा त्याग केला आहे; त्यामुळेच सारा समाज संविधानाच्या माध्यमातून आनंदात आहे,’ असे प्रतिपादन आजी-माजी विद्यार्थी संघटना शिवाजी विद्यापीठाचे डॉ. प्रवीण कोडोलीकर यांनी केले.
विचारे माळे येथे निळा रक्षकतर्फे रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी डॉ. कोडोलीकर बोलत होते. याप्रसंगी ते म्हणाले, ‘एखादे चांगले कार्य करायचे असेल तर त्यासाठी पत्नीचा त्याग सुद्धा महत्त्वाचा असतो. रमाई यांनी अनेक हालअपेष्टा सहन करत बाबासाहेब यांना कायमच पाठिंबा देण्याचं काम केलं त्यांचा त्याग समाज कधीच विसरणार नाही.’ कार्यक्रमाला  अनिल भोसले, अनिल माने, विराज सुतार, राहुल शिंदे,  नितिन शिंदे, निलेश शिंदे, रोहन वाघमारे, सतिश साळवे, राजू भंडारे आदी  उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes