Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
एकाच विषयावर फोकस नाही, ग्रामीण भागाचा सर्वांगिण विकास हाच अजेंडा - सीईओ डॉ. जस्मिनसतेज पाटलांचा वाढदिवस होणार लोकोत्सव, दहा लाख वह्या संकलनाचे उद्दिष्ट पदोन्नतीच्या फरकाची रक्कम जमा, प्राध्यापक महासंघातर्फे अधिकाऱ्यांचा सत्कारभाजपाचा वर्धापनदिन, सिनीअर कार्यकर्त्यांचा सन्मान अन् २०२९ च्या निवडणुकीसाठी तयारीचे आवाहनकार डीलर्स असोसिएशनतर्फे क्रिकेट स्पर्धा, सोळा संघाचा सहभागयुवा ग्रामीण पतसंस्थेस ४६ लाखाचा नफा – चेअरमन अर्जुन आबिटकरभगवान महावीर जयंतीनिमित्त गुरुवारी नवकार महामंत्र पठण अक्कमहादेवी पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात, सुजाता विभूते, संगीता करंबळी सन्मानितवैद्यकीय अधिकारी सक्तीच्या रजेवरबसव केंद्रातर्फे चित्रदुर्ग मठात मासिक अनुभव मंटप कार्यक्रम उत्साहात

जाहिरात

 

रमाईच्या त्यागामुळेच सारा समाज आनंदात- डॉ. प्रवीण कोडोलीकर

schedule07 Feb 25 person by visibility 771 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘विश्वरत्न डॉ  बाबासाहेब आंबेडकर यांनी मानव जातीला आदर्श निर्माण करून दिला. त्यांच्या पत्नी रमाई आंबेडकर यांनी सुद्धा त्यासाठी खूप मोठा त्याग केला आहे; त्यामुळेच सारा समाज संविधानाच्या माध्यमातून आनंदात आहे,’ असे प्रतिपादन आजी-माजी विद्यार्थी संघटना शिवाजी विद्यापीठाचे डॉ. प्रवीण कोडोलीकर यांनी केले.
विचारे माळे येथे निळा रक्षकतर्फे रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी डॉ. कोडोलीकर बोलत होते. याप्रसंगी ते म्हणाले, ‘एखादे चांगले कार्य करायचे असेल तर त्यासाठी पत्नीचा त्याग सुद्धा महत्त्वाचा असतो. रमाई यांनी अनेक हालअपेष्टा सहन करत बाबासाहेब यांना कायमच पाठिंबा देण्याचं काम केलं त्यांचा त्याग समाज कधीच विसरणार नाही.’ कार्यक्रमाला  अनिल भोसले, अनिल माने, विराज सुतार, राहुल शिंदे,  नितिन शिंदे, निलेश शिंदे, रोहन वाघमारे, सतिश साळवे, राजू भंडारे आदी  उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes