Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सोयीच्या बदलीसाठीची बोगसगिरी महागात, तेरा शिक्षक निलंबित !विवेकानंद कॉलेजमध्ये  राष्ट्रीय चर्चासत्र,  महाराष्ट्र हिंदी परिषदेच्या अधिवेशनाचे आयोजनरामानंदनगर-जरगनगरात महायुतीच्या उमेदवारांचा प्रचाराचा धडाकासतेज पाटलांनी केला केएमटीने प्रवास, प्रवाशांशी साधला संवादतंत्रज्ञानातील सक्षमतेमुळे विकसित भारतचे स्वप्न लवकरच सत्यात - प्रा. टी जी सीताराम सदर बाजार - विचारेमाळ परिसरात महायुतीच्या प्रचारफेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद लेकाच्या प्रचारार्थ माय मैदानात, महायुतीचा केला प्रचार ! सहज संवादशैलीने मंगळवार पेठवासिय भारावले !!स्वच्छ - हरित कोल्हापूर, भ्रष्टाचारमुक्त महापालिका : शिवसेना ठाकरे पक्षाचा वचननामा वारसदार अण्णांचा…वारसा समाजकार्याचा ! !लाडक्या बहिणींच्या आशीर्वादावर महायुतीची महापालिकेत सत्तेवर येणार - सत्यजीत कदम

जाहिरात

 

रमाईच्या त्यागामुळेच सारा समाज आनंदात- डॉ. प्रवीण कोडोलीकर

schedule07 Feb 25 person by visibility 606 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘विश्वरत्न डॉ  बाबासाहेब आंबेडकर यांनी मानव जातीला आदर्श निर्माण करून दिला. त्यांच्या पत्नी रमाई आंबेडकर यांनी सुद्धा त्यासाठी खूप मोठा त्याग केला आहे; त्यामुळेच सारा समाज संविधानाच्या माध्यमातून आनंदात आहे,’ असे प्रतिपादन आजी-माजी विद्यार्थी संघटना शिवाजी विद्यापीठाचे डॉ. प्रवीण कोडोलीकर यांनी केले.
विचारे माळे येथे निळा रक्षकतर्फे रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी डॉ. कोडोलीकर बोलत होते. याप्रसंगी ते म्हणाले, ‘एखादे चांगले कार्य करायचे असेल तर त्यासाठी पत्नीचा त्याग सुद्धा महत्त्वाचा असतो. रमाई यांनी अनेक हालअपेष्टा सहन करत बाबासाहेब यांना कायमच पाठिंबा देण्याचं काम केलं त्यांचा त्याग समाज कधीच विसरणार नाही.’ कार्यक्रमाला  अनिल भोसले, अनिल माने, विराज सुतार, राहुल शिंदे,  नितिन शिंदे, निलेश शिंदे, रोहन वाघमारे, सतिश साळवे, राजू भंडारे आदी  उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes