Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन यांना खासदार महाडिकांच्या शुभेच्छासोशल मिडीयाच्या अतिरेकामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वात अडथळे - डॉ. विश्वनाथ मगदूमशिवसेनेतर्फे इच्छुक उमेदवारासह पदाधिकाऱ्यांचा शुक्रवारी मेळावा : आमदार राजेश क्षीरसागर गोकुळचा जातीवंत म्हैशींच्या संगोपनावर भर; राधानगरीत कृती कार्यक्रमाला प्रतिसादविवाह सोहळा नात्यापलीकडचा…निराधार लेकीच्या कन्यादानाचा पेटंटचे स्टार्टअपमध्ये रूपांतर होणे अत्यंत महत्वाचे – डॉ.मोहन वनरोट्टीसंजय घोडावत विद्यापीठाच्या प्रांगणात उलगडली नाना पाटेकरची मुलूखगिरी ! सिनेमा, नाटकासह सामाजिक कार्यावर प्रकाशझोत !! करवीर तहसिलदारपदी स्वप्नील पवारवीरशैव बँकेची निवडणूक बिनविरोध, नवीन चेहऱ्यांना संधी५० हून अधिक नगरसेवकांनी दिल्या काँग्रेसकडे मुलाखती ! इच्छुकांची संख्या ३२९ ! !

जाहिरात

 

रमाईच्या त्यागामुळेच सारा समाज आनंदात- डॉ. प्रवीण कोडोलीकर

schedule07 Feb 25 person by visibility 555 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘विश्वरत्न डॉ  बाबासाहेब आंबेडकर यांनी मानव जातीला आदर्श निर्माण करून दिला. त्यांच्या पत्नी रमाई आंबेडकर यांनी सुद्धा त्यासाठी खूप मोठा त्याग केला आहे; त्यामुळेच सारा समाज संविधानाच्या माध्यमातून आनंदात आहे,’ असे प्रतिपादन आजी-माजी विद्यार्थी संघटना शिवाजी विद्यापीठाचे डॉ. प्रवीण कोडोलीकर यांनी केले.
विचारे माळे येथे निळा रक्षकतर्फे रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी डॉ. कोडोलीकर बोलत होते. याप्रसंगी ते म्हणाले, ‘एखादे चांगले कार्य करायचे असेल तर त्यासाठी पत्नीचा त्याग सुद्धा महत्त्वाचा असतो. रमाई यांनी अनेक हालअपेष्टा सहन करत बाबासाहेब यांना कायमच पाठिंबा देण्याचं काम केलं त्यांचा त्याग समाज कधीच विसरणार नाही.’ कार्यक्रमाला  अनिल भोसले, अनिल माने, विराज सुतार, राहुल शिंदे,  नितिन शिंदे, निलेश शिंदे, रोहन वाघमारे, सतिश साळवे, राजू भंडारे आदी  उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes