Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
णण यतसंत तुकारामांचे अभंग हे केवळ भक्तीपर नसून समाजप्रबोधनाचे प्रभावी साधन – डॉ. जी. पी. माळीशाहू मिलच्या जागेत राजर्षी शाहूंचे स्मारक, कापड पर्यटन केंद्रही उभारणारमुश्रीफ –कोरेंच्यामध्ये ऑल इज नॉट वेल…एकेकाळच्या मित्रांत वाढतेय राजकीय अंतर !जिल्ह्यातील नेत्यांमध्ये एकमत होईना, जिप अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टातसरकारी शाळा बंद करण्याच्या धोरणाविरोधात कोर्टात आव्हान, दोन एप्रिलला सुनावणीदुधाळ जनावरांसाठी पॅरामेट्रिक विमा योजना -  चेअरमन नविद मुश्रीफशिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, अर्थसंकल्पानंतर व्यापक बैठक श्रीशैल देवस्थानात सोळा ते वीस मार्च दरम्यान उगादी महोत्सव जिल्ह्यात सोळा मार्चपासून विशेष हेल्मेट तपासणी मोहीम, नो हेल्मेट - नो एट्री

जाहिरात

 

संत तुकारामांचे अभंग हे केवळ भक्तीपर नसून समाजप्रबोधनाचे प्रभावी साधन – डॉ. जी. पी. माळी

schedule05 Mar 26 person by visibility 26 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ संत तुकारामांचे अभंग हे केवळ भक्तीपर नसून समाजप्रबोधनाचे प्रभावी साधन आहे. समाजातील अंधश्रद्धा, जातिभेद, अन्याय आणि दांभिकपणा व कर्मकांड यावर तुकारामांनी कठोर शब्दांत प्रहार केला. त्यांच्या विचारांमध्ये समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश स्पष्टपणे दिसून येतो.’असे प्रतिपादन साहित्यिक डॉ. जी.पी. माळी यांनी केले.  

महाराष्ट्रातील अग्रगण्य महिला विद्यापीठ असलेले ताराराणी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्यावतीने गुरुवारी (पाच मार्च २०२६ ) ‘तुकाराम बीज’ सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या अंतर्गत ‘प्रबोधनकार संत तुकाराम’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले होते.  ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. एस.एन. पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.    

 ‘प्रबोधनकार संत तुकाराम’ या विषयावर प्रभावी मार्गदर्शन करताना डॉ. माळी यांनी, संत तुकाराम महाराजांच्या विचारांचे आधुनिक संदर्भात महत्त्व अधोरेखित केले. ‘तुकारामांची भक्ती ही कृतीशील होती; ती केवळ मंदिरापुरती मर्यादित नव्हती, तर समाजपरिवर्तनाशी निगडित होती. तुकाराम महाराज यांच्या प्रबोधनाचा विचार महाराष्ट्र व देशाच्या पुनर्रबांधणीसाठी  आवश्यक आहे. वारकरी परंपरा समाजात ऐक्य आणि सदभावना  निर्माण करणारी आहे. संत साहित्य हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे अधिष्ठान आहे. आजच्या स्पर्धात्मक जीवनात संत तुकारामांच्या साधेपणाचा व नैतिकतेचा आदर्श सर्वांनी स्वीकारण्याची गरज आहे.’असे माळी यांनी नमूद केले. कार्यक्रमाची सुरुवात संत तुकाराम यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी उषाराजे हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी संत तुकाराम यांचा अभंग सादर करून वातावरण भक्तिमय केले. प्रा. डॉ. सुजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. सोनाली चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. सुधाराणी पाटील यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes