Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
आंदोलनातील शिक्षक -कर्मचाऱ्यांचे दोन दिवस विनावेतन होणारदूरशिक्षणसह ऑनलाईन शिक्षण आजची गरज : डॉ. विलास शिंदेकोल्हापूर-वैभववाडी रेल्वे संदर्भात दिल्लीत रेल्वेमंत्र्यांच्यासोबत बैठक घ्यावी-कोल्हापूर फर्स्टची मागणीराज्यस्तरीय विज्ञान कथा स्पर्धा, कथा पाठविण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंतकोल्हापुरातील आयटी पार्कसाठी राजेश क्षीरसागरांची विधिमंडळात लक्षवेधी ! लवकरच बैठकीची राज्यमंत्र्यांची ग्वाही !!महापालिकेत आयुक्तपदी महिला, पण शहरात महिलांच्यासाठी स्वच्छतागृहांची वाणवा पिढया बदलतील, वक्ते-श्रोते नवीन असतील ! तर्कतीर्थांचे तर्क मात्र तेच राहतील !!केंद्रीयमंत्र्यांनी केले गोकुळचे कौतुक ! सहकार मंत्रालयामार्फत सहकार्याची ग्वाही !!पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत प्रिन्स शिवाजी जाधववाडी शाळेचे यशपन्हाळा नगरपरिषदचे सुपर स्वच्छ लीगमध्ये देशपातळीवर यश, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव

जाहिरात

 

प्रवेश पत्रात चूक झालेल्या त्या विद्यार्थ्यांनाही देता येणार बारावीची परीक्षा-पालकमंत्री प्रकाश आबिटकर

schedule09 Feb 25 person by visibility 329 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : येथील विमला गोयंका इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने आय. टी. , कॉम्प्युटर सायन्स आणि क्रॉप सायन्स या विषयांची मंडळ मान्यता न घेता इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांकडून या विषयांचे फॉर्म भरुन घेतले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेश पत्रावर या विषयांचे हॉल तिकीट (प्रवेश पत्र) मिळाले नाही. परंतु या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभागाने तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या होत्या. यानुसार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी राज्य मंडळाशी संपर्क करुन तातडीने पाठपुरावा केला. 

राज्य मंडळाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दंडात्मक शुल्क आकारुन विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार त्यांची त्या त्या विषयांची परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठी आवश्यक ती प्रक्रिया करण्याबाबत संबंधित कॉलेजला सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित कॉलेजमधील कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही, याबाबतची दक्षता मंडळामार्फत घेण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात अभ्यास करावा. विमला गोयंका इंग्लिश मीडियम स्कूल व ज्यु कॉलेज मधील बारावीच्या या सर्व मुलांची परीक्षा घेण्यात येईल. पालकांनीही मुलांना विश्वास द्यावा. फॉर्म भरायचे राहिलेल्या विद्यार्थ्यांचे अतिविशेष अतिविलंब शुल्कासह फॉर्म ऑनलाईन पद्धतीने कॉलेजमार्फत भरता येतील. त्यामुळे विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ दिले जाणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे.

या कनिष्ठ महाविद्यालयात बारावीचे विज्ञान शाखेचे एकूण १४९ विद्यार्थी असून त्यापैकी ७० विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म कॉलेजने ऑनलाईन भरलेले नव्हते. फॉर्म भरलेल्या ७९ विदयार्थ्यांपैकी २६ विद्यार्थ्यांना विषयात दुरुस्ती हवी आहे.   कॉलेजने प्रीलिस्ट दुरुस्तीच्या वेळी विद्यार्थ्यांच्या फॉर्ममधील नाव, विषय, माध्यम यासंबंधीची माहिती तपासून दुरुस्त्या करुन घेणे अपेक्षित होते. तसेच २० जानेवारी २०२५पासून सुधारित ऑनलाइन प्रवेश पत्र उपलब्ध करुन दिलेली माहिती तपासून, आवश्यक त्या दुरुस्त्या करुन घेणे अपेक्षित होते. तशी कार्यवाही कॉलेज कडून झाली नाही. या कनिष्ठ महाविद्यालयाने भरलेल्या फॉर्मनुसार बोर्डाने हॉल तिकीट दिली आहेत. यात  शिक्षण मंडळाकडून कोणतीही चूक झालेली नाही, असे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी कळवले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes