Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कंगना राणावतांच्या विरोधात कोल्हापुरात काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक, हाती घेतले चप्पलगोकुळचा निवडणूक कार्यक्रम तत्काळ सुरू करा : सर्किट बेंचचा आदेशसत्यशोधक इतिहास परिषदेतर्फे रविवारी अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनसाहित्यिक चंद्रकुमार नलगे यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात यावे : डॉ. सुनीलकुमार लवटे विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांच्या पतसंस्थेतर्फे दिवंगत सभासदाच्या वारसांना अर्थसहाय्य थकीत घरफाळा वसुलीसाठी महापालिकेची कडक पावले !  मिळकतधारकांवर सक्त कारवाई, कर्मचाऱ्यांचे पगार थांबणार !!हवाई दलातील निवृत्त अधिकाऱ्याची शिवाजी विद्यापीठातून पीएचडीठठ ददरंगकर्मींचे भर पावसात आंदोलन, खाजगीकरणाच्या विरोधात बरसल्या घोषणाउद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेनेतर्फे वृक्षारोपण

जाहिरात

 

दुरावलेल्या नगरसेवकांच्या घरवापसीसाठी राष्ट्रवादीची फिल्डींग ! भैय्या माने, युवराज पाटलांच्यावर जबाबदारी !!

schedule17 Jun 25 person by visibility 848 categoryराजकीय

आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : महापालिका निवडणूक ताकतीने लढविण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षांनी केला आहे. सक्षम उमेदवार निवडायचे आणि निवडणूक जिंकायची ही निती आखण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून पक्षापासून दुरावलेल्या माजी नगरसेवकांना पुन्हा एकदा सामावून घेण्यात येणार आहे. नगरसेवकांच्या या घरवापसीची जबाबदारी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैय्या माने, गोकुळचे संचालक युवराज पाटील यांच्यावर सोपविली आहे. त्यांच्या सोबतीला, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास, माजी नगरसेवक महेश सावंत, उत्तम कोराणे असणार आहेत. नजीकच्या काळात जवळपास दहा माजी नगरसेवक पुन्हा राष्ट्रवादीत परतणार असल्याचे वृत्त आहे.

साधारणपणे दिवाळीनंतर महापालिका निवडणुका होण्याचे संकेत मिळत आहेत. त्या अनुषंगाने सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. आढावा बैठक घेऊन अंदाज घेतला जात आहे. शिवसेनेने तर माजी नगरसेवकांच्या इनकमिंगवर भर दिला आहे. भाजपानेही पदाधिकारी व नगरसेवकांच्या बैठका घेतल्या आहेत. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही महापालिका निवडणुकीसाठी सरसावला आहे.  माजी नगरसेवकांच्या लागोपाठ दोन बैठका झाल्या. मंत्री व जिल्हयाचे नेते हसन मुश्रीफ यांनी महायुती म्हणून साऱ्यांनी एकत्र लढायचे आहे. महायुतीच्या नेतेमंडळी व पदाधिकाऱ्यांसोबत समन्वय ठेवा अशा सूचना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत. तसेच राष्ट्रवादीतील कोणी अन्य पक्षाची वाट चोखाळू नये यासाठी खबरदारी घ्या, विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही असेही बजावले आहे.

 महायुतीतर्फे निवडणूक लढताना राष्ट्रवादीही सक्षम उमेदवाराच्या शोधात आहे. अशा सक्षम उमेदवारांचा शोध राष्ट्रवादी घेत आहे. पूर्वी जे पक्षात होते, पण काही कारणास्तव दुरावले आहेत. त्यांना पुन्हा पक्षात सामावून घेण्याला प्राधान्यक्रम असणार आहे. माजी महापौर सुनिता राऊत, माजी उपमहापौर प्रकाश पाटील, स्थायी समितीचे माजी सभापती सचिन पाटील, माजी नगरसेवक विनायक फाळके हे पूर्वी राष्ट्रवादीशी निगडीत होते. यांच्याशी संपर्क साधला जाणार आहे. भैय्या माने व युवराज पाटील यांच्यावर ही जबाबदारी सोपविली आहे.  याशिवाय महापालिकेत सत्तेत असताना मित्र पक्ष असलेल्या व राष्ट्रवादीशी जवळीक असलेल्या नगरसेवकांवरही जाळे टाकण्यात येणार आहे. माजी नगरसेविका तेजस्विनी घोरपडे यांचे पती नागेश घोरपडे हे राष्ट्रवादीत सक्रिय झाले आहेत. माजी नगरसेवक संभाजी जाधव, महेश कदम, अजित मोरे यांना राष्ट्रवादीत आणता येईल का ? याविषयी त्यांची मते जाणून घ्यावीत असेही बैठकीत ठरले. अन्य नगरसेवक व सक्षम उमेदवारांचा शोध घेण्याचे काम राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास, महेश सावंत, उत्तम कोराणे हे  पाहणार आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes