Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
20 ते 29 नोव्हेंबर या कालावधीत गोकुळश्री स्पर्धाडी वाय पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव, 90 वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजराकोल्हापुरात आपुलकीचा फराळ !दाजीपूर अभयारण्यमध्ये शुक्रवारपासून जंगल सफारीखाजगी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेतर्फे शून्य टक्के व्याजदराने ई-बाइकचे वितरणरांगडे कोल्हापूर…हटके स्पर्धा ! दुचाकी चालवित नेतेमंडळींनी वाढविला उत्साह!!अखंडपणे तेवत राहणारे ज्ञानदीपदक्षिण कोरियातील आंतरराष्ट्रीय कार्यशाळेसाठी डॉ.विलास कारजिन्नी, डॉ. सौरभ बोरचाटेंना निमंत्रणदिवाळीची खरेदी करुन घरी जाताना टेम्पोंची धडक, भाऊ-बहिणीसह पुतणी ठारकेआयटीमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

जाहिरात

 

नव साक्षरता कार्यक्रमात शिक्षणाधिकारी डॉ.किरण लोहार यांचा सन्मान

schedule30 Sep 24 person by visibility 687 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र  न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : जन साक्षरता 'या संकल्पनेतून केंद्र सरकारने हाती घेतलेल्या नवभारत साक्षरता कार्यक्रमाची ठोस अमंलबजावणी रत्नागिरी जिल्ह्यात योजना विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी केली. या उल्लास -नवभारत साक्षरता कार्यक्रम -राज्यस्तरीय उल्लास मेळाव्यात योजना  विभागाचे शिक्षणाधिकारी  डॉ.किरण लोहार यांच्या सेवेचा सन्मान शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते  झाला.
     वय वर्षे  पंधरा ते त्यापुढील वयोगटातील निरक्षर लोकांना(असाक्षर )पायाभूत साक्षरता, संख्यज्ञान , जीवन कौशल्य विकसित करण्या साठी स्वयंसेवक, शिक्षक , विद्यार्थी यांना उचित मार्गदर्शन करत स्वतः पुढाकार घेऊन काम केले. त्याच बरोबर पुणे येथील रत्नागिरी जिल्ह्याची स्टॉल मांडणी पाहून योजना विभागाचे संचालक  महेश पालकर, उपसंचालक राजेश क्षीरसागर  यांनी भेट देऊन तयारी पाहून समाधान व्यक्त केले.    
 रत्नागिरी जिल्ह्याने केलेल्या अतिउत्कृष्ट कामकाजा बद्दल रविवार दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी राज्यस्तर नवभारत साक्षरता मेळावा , एस सी आर टी पुणे येथे उत्साहात  झाला.शिक्षणाधिकारी (योजना )डॉ.किरण लोहार यांच्या या सेवेचा सन्मान शिक्षणमंत्री केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी केंद्रीय सचिव अर्चना शर्मा , प्रधान सचिव आय ए कुंदन , शिक्षण आयुक्त सूरज मांढरे , राज्य प्रकल्प संचालक आर विमला , संचालक राहुल रेखा राव , शिक्षण संचालक शरद गोसावी , संचालक कृष्णकुमार पाटील , शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक संपत सुर्यवंशी , अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद नंदकुमार बेडसे ,शिक्षण संचालनालय (योजना ) महाराष्ट्र राज्य डॉ. महेश पालकर या मान्यवरांची उपस्थिती होती.
रत्नागिरी जिल्ह्याने दिलेल्या उद्दिष्टच्या 200 टक्के हून अधिक केलेले काम, त्यातील सातत्य यामूळ 35 मंजूर स्टाफपैकी फक्त्त, तीनच जण कार्यरत असताना हे यश मिळवू शकलो यांचा खूप अभिमान वाटतो. असे लोहार यांनी सांगितले.


जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes