‘गोकुळ’च्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार, कर्मचाऱ्यांच्या कष्टाची संस्थेला जाणीव
schedule29 Nov 20 person by visibility 523 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करुन ‘गोकुळ’ला यशाच्या शिखरावर पोहचविण्यात मोलाचा वाटा असणारे कर्मचारी सेवेतून निवृत्त होत आहेत. याची मनाला खंत वाटते. तथापि संघाच्या नियमानुसार कार्यकाल पूर्ण झाल्यावर सर्वांनाच सेवानिवृत्त व्हावे लागते. अशा कर्मचाऱ्यांच्या कष्टाची जाणीव ‘गोकुळ’ नेहमीच ठेवेल.’असे प्रतिपादन संस्थेचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी केले.
‘गोकुळ’मधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सत्काराप्रसंगी ते बोलत होते. गोकुळ दूध प्रकल्प कार्यस्थळावरील स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांच्या स्मारकाजवळ हा कार्यक्रम झाला. ३२ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नरके म्हणाले, ‘ या कर्मचाऱ्यांनी गोकुळसाठी सुरुवातीच्या काळात अल्प पगारावर कष्टाची कामे केली. आज कर्मचाऱ्यांच्या सेवेचा जरी समारोप झाला असला तरी त्यांनी पुढील आयुष्यामध्ये जास्तीत जास्त वेळ परिवारासाठी द्यावा.’
याप्रसंगी माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक रणजितसिंह पाटील, विश्वास पाटील, अरुण डोंगळे, विश्वास जाधव, धैर्यशील देसाई, दीपक पाटील, पी. डी. धुंदरे, उदय पाटील, बाळासाहेब खाडे, बाबा देसाई,रामराजे कुपेकर-देसाई, संचालिका श्रीमती जयश्री पाटील-चुयेकर, अनुराधा पाटील, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, बोर्ड सेक्रेटरी एस. एम.पाटील, प्रशासन व्यवस्थापक डी. के. पाटील आदी उपस्थित होते.