Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
मार्केट सेस चालूच राहणार, कोल्हापूर बाजार समितीचे राष्ट्रीय बाजार समितीत वर्गीकरण नाही - मंत्री जयकुमार रावळ सार्वजनिक कार्यक्रमात अश्लिल - आक्षेपार्ह नृत्य सादरीकरणास प्रतिबंध करा - कलापथक निर्माता असोसिएशनराज्यस्तरीय तेली समाजाच्या व्यासपीठावर मंत्री बावनकुळे - विजय वडेट्टीवारांच्यामध्ये राजकीय जुगलबंदी ! पक्ष प्रवेशाची ऑफर, एक नंबर मंत्रीपदासाठी शुभेच्छा!!विद्यार्थी - पालकांनी जगण्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे :  आमदार सतेज पाटील आधी नोंदणी - मग स्थापना, तरीही संरक्षण ? गोकुळमधील अवसायन संस्थेसंबंधी उलटसुलट चर्चामंगेश चिवटेंना शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेत पाठवा : आमदार राजेश क्षीरसागर,  आमदार सुहास बाबर यांची  मागणीगोकुळच्या राजकारणात आमनेसामने उभे ठाकलेले एसटी बसेसच्या उद्घाटनला एकत्रविद्यार्थी चमकले शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत, शाळेने काढली मिरवणूक झोकात!व्यापारी किशोरकुमार नष्टे यांचे निधनजुनी पेन्शनसाठी शिक्षकदिनी शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा

जाहिरात

 

जिप, महापालिकेच्या निवडणुकांना ३१ जानेवारीपर्यंत डेडलाइन ! मुदतवाढीवरुन सुप्रीम कोर्टाने फटकारले ! !

schedule16 Sep 25 person by visibility 771 categoryमहानगरपालिका

 

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : महाराष्ट्रातील महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकेसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया ३१ जानेवारी २०२६ पर्यत पूर्ण करा असे स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने दिले. महाराष्ट्र सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात निवडणुकीसाठी मुदतवाढ मिळावी यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर सुप्रीम कोर्टात (१६ सप्टेंबर २०२५) सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने चार महिन्याच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. त्याला विलंब का होत आहे ? अशा शब्दांत कोर्टाने सरकार व राज्य निवडणूक आयोगालाही फटकारले.

‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पुरेसे ईव्हीएम मशिन नाहीत, मनुष्यबळाची कमतरता आहे. शिवाय सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे निवडणूक पुढे ढकलावी’अशी मागणी निवडणूक आयोग व सरकारने सुप्रीम कोर्टाकडे केली होती. त्यावर सुप्रीम कोर्टाने, यापूर्वी चार महिन्याची मुदत देऊनही पुन्हा निवडणूक घेण्यास मुदतवाढ मागण्यावररुन सरकार व निवडणूक आयोगाला फटकारले. त्यावर निवडणूक आयोगाने येत्या दोन महिन्यात ईव्हीएम मशिन उपलब्ध होत असल्याचे सांगितले. त्यावर सुप्रीम कोर्टाने निवडणुकीसाठ ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे, त्याची यादी राज्य सरकारच्या सचिवांना द्या, सगळयाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक विषयक कामे गतीने करा. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना ३१ जानवारी २०२६ पर्यंत पूर्ण झाल्या पाहिजेत असे कोर्टाने बजावले आहे. निवडणुका या वेळेवर झाल्या पाहिजेत, यापुढे निवडणुकीसाठी काणत्याही प्रकारची मदुतवाढ दिली जाणार नाही असे स्पष्ट केले आहे.

चार महिन्याची मुदत ३१ ऑक्टोबरला संपतेय

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेली तीन ते पाच वर्षे झाली नाहीत. काही महापालिकेच्या सभागृहाची मुदत संपून पाच वर्षाचा कालावधी उलटला आहे. ओबीसी आरक्षणासह अन्य कारणामुळे सातत्याने निवडणुका पुढे गेल्या. मे २०२५ मध्ये सुप्रीम कोर्टाने निवडणुकीवरील स्थगिती उठविली. आणि सरकार व राज्य निवडणूक आयोगाला चार महिन्यात म्हणजे ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मतदार यादी, प्रभाग रचनांची निश्चिती, प्रारुप प्रभार रचना जाहीर करणे या प्रक्रिया पार पडल्या. दरम्यान सणासुदीचे दिवस, ईव्हीएमची कमतरता आणि कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या यामुळे निवडणुकीला मुदतवाढ मिळावी अशी मागणी केली होती. सुप्रीम कोर्टाने ती मागणी मान्य केल्यामुळे निवडणूक आयोगाला दिलासा मिळाला. मात्र सुप्रीम कोर्टाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत सगळया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याविषयी स्पष्ट आदेश दिले आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes