+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustबाबाभाई वसा म्हणजे कोल्हापूरच्या उद्यमनगरीचा अभ्यासू-उद्योजक ! शोकसभेत उद्योजकांनी जागविल्या आठवणी !! adjustविभागीय क्रीडा स्पर्धेत शहीद महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे यश adjust कोल्हापुरात काँग्रेसचा सरप्राइज चेहरा कोण ? आज उत्तर मिळणार ! adjust शिवसेनेकडून आमदार प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरकेंना उमेदवारी adjustदक्षिणमध्ये पाटील, महाडिकांनी घेतले अर्ज ! उत्तरसाठी अर्ज घेणाऱ्यांत व्ही.बी, सत्यजित कदम यांची नावे !! adjustदूध उत्पादकांसाठी खुशखबर, गोकुळतर्फे नवीन ४००० बायोगॅस मंजूर ! चेअरमन अरुण डोंगळे adjustप्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांंना ३५ हजार रुपयांचा दंड, ३०० किलो प्लॅस्टिक जप्त adjustराहुल आवाडे गुरुवारी अर्ज भरणार adjust कोल्हापुरात बाइकस्वारांची धूम adjustशिवाजी विद्यापीठ नियतकालिक स्पर्धेत विवेकानंद कॉलेज प्रथम
1001157259
1001130166
1000995296
schedule06 Jul 24 person by visibility 234 categoryलाइफस्टाइल
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन या संस्थेने सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. या वर्षात क्लबच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातील अेेशी माहिती क्लबच्या अध्यक्षा अरुंधती महाडकि यांनी दिली.
 पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण करणे काळाची गरज आहे. प्रत्येकाने किमान एक रोपटे लावून त्याचे संवर्धन करावे, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या नूतन अध्यक्षा महाडिक यांनी केले. विकासवाडी आणि कागल पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीमध्ये आज वृक्षारोपण करण्यात आले.
 क्लबचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. यानिमित्ताने वृक्षारोपण करून, नव्या वर्षातील सामाजिक उपक्रमांचा श्रीगणेशा करण्यात आला. सौ. अरूंधती महाडिक, उपाध्यक्षा डॉ. मिरा कुलकर्णी, सचिव बी. एस. शिंपुकडे, खजानिस अनिरूध्द तगारे यांच्या हस्ते विकासवाडी परिसरात विविध देशी वृक्षांची रोपे लावण्यात आली. तसेच सुवर्ण महात्सवी वर्षात पदार्पण केलेल्या रोटरी क्लब मिड टाऊन कडून वर्षभरात अभिनव सामाजिक उपक्रम राबवले जातील. विशेषतः पर्यावरण रक्षण आणि संवर्धनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातील. प्रत्येक व्यक्तीनं किमान एक रोप लावून, त्याचे संवर्धन करावे, असे आवाहनही सौ. महाडिक यांनी केले. 
यावेळी बी. एस. शिंपुकडे, करूणाकर नायक, दिपक मिरजे, डॉ. रमेश खटाबर यांनीही मनोगत व्यक्त केले. तर रोटरीच्या सर्व सदस्यांना झाडांची रोपं भेट देण्यात आली. यावेळी विकासवाडी आणि कागल पंचतारांकीत औद्योगिक वसाहत परिसरात शंभर पेक्षा अधिक रोपांची लागवड करण्यात आली. कार्यक्रमाला शरद पाटील, रितू वायचळ, भारती नायक, राज शेख, सचिन लाड, जगदीश चव्हाण, राजू घोरपडे यांच्यासह रोटरॅक्टच्या अध्यक्षा प्रेरणा जाधव, सचिव अनुष्का शिंदे उपस्थित होते.