महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : इचलकरंजी विधानसभा मतदारसंंघातील महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांनी नागरिकांशी संवाद व चाय पे चर्चा केली. तोडकर मळा येथे संपर्क दौरा झाला.
‘चाय पे चर्चा' या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या समस्या, अपेक्षा आणि भावना जाणून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. या चर्चेतून नव्या दृष्टिकोनांसह, समस्यांच्या सोडवणुकीसाठी प्रभावी उपाय शोधण्याची प्रेरणा मिळाली. नागरिकांशी थेट संवाद साधताना आम्हाला केवळ शिकण्याची संधी मिळाली नाही, तर समाजाच्या गरजा आणि अपेक्षांची अधिक स्पष्ट समजही निर्माण झाली, ज्यामुळे मनाला समाधान आणि उद्दिष्टे साध्य करण्याची नवी ऊर्जा मिळाली. असे आवाडे यांनी सांगितले.
याप्रसंगी आवाडे यांनी, नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. भविष्यातही सातत्याने कार्यरत राहू असे सांगितले.यावेळी भाजपा शहर अध्यक्ष पै. अमृत मामा भोसले, प्रमुख पदाधिकारी यांच्यासह तोडकर मळा परिसरातील ज्येष्ठ नागरिक व युवक उपस्थित होते.