+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustअजित पवार गटाकडून 38 उमेदवारांची यादी, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटलांचा समावेश adjustबाबाभाई वसा म्हणजे कोल्हापूरच्या उद्यमनगरीचा अभ्यासू-उद्योजक ! शोकसभेत उद्योजकांनी जागविल्या आठवणी !! adjustविभागीय क्रीडा स्पर्धेत शहीद महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे यश adjust कोल्हापुरात काँग्रेसचा सरप्राइज चेहरा कोण ? आज उत्तर मिळणार ! adjust शिवसेनेकडून आमदार प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरकेंना उमेदवारी adjustदक्षिणमध्ये पाटील, महाडिकांनी घेतले अर्ज ! उत्तरसाठी अर्ज घेणाऱ्यांत व्ही.बी, सत्यजित कदम यांची नावे !! adjustदूध उत्पादकांसाठी खुशखबर, गोकुळतर्फे नवीन ४००० बायोगॅस मंजूर ! चेअरमन अरुण डोंगळे adjustप्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांंना ३५ हजार रुपयांचा दंड, ३०० किलो प्लॅस्टिक जप्त adjustराहुल आवाडे गुरुवारी अर्ज भरणार adjust कोल्हापुरात बाइकस्वारांची धूम
1001157259
1001130166
1000995296
schedule22 Oct 24 person by visibility 41 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  इचलकरंजी विधानसभा मतदारसंंघातील महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांनी नागरिकांशी संवाद व चाय पे चर्चा केली. तोडकर मळा येथे संपर्क दौरा झाला. 
 ‘चाय पे चर्चा' या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या समस्या, अपेक्षा आणि भावना जाणून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. या चर्चेतून नव्या दृष्टिकोनांसह, समस्यांच्या सोडवणुकीसाठी प्रभावी उपाय शोधण्याची प्रेरणा मिळाली. नागरिकांशी थेट संवाद साधताना आम्हाला केवळ शिकण्याची संधी मिळाली नाही, तर समाजाच्या गरजा आणि अपेक्षांची अधिक स्पष्ट समजही निर्माण झाली, ज्यामुळे मनाला समाधान आणि उद्दिष्टे साध्य करण्याची नवी ऊर्जा मिळाली. असे आवाडे यांनी सांगितले. 
 याप्रसंगी आवाडे यांनी, नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. भविष्यातही  सातत्याने कार्यरत राहू असे सांगितले.यावेळी भाजपा शहर अध्यक्ष पै. अमृत मामा भोसले, प्रमुख पदाधिकारी यांच्यासह तोडकर मळा परिसरातील ज्येष्ठ नागरिक व युवक उपस्थित होते.