+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust के. पी. पाटलांचा ठाकरे गटात प्रवेश ! राधानगरीत शिवसेना विरुद्ध शिवसेना !! adjustअजित पवार गटाकडून 38 उमेदवारांची यादी, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटलांचा समावेश adjustबाबाभाई वसा म्हणजे कोल्हापूरच्या उद्यमनगरीचा अभ्यासू-उद्योजक ! शोकसभेत उद्योजकांनी जागविल्या आठवणी !! adjustविभागीय क्रीडा स्पर्धेत शहीद महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे यश adjust कोल्हापुरात काँग्रेसचा सरप्राइज चेहरा कोण ? आज उत्तर मिळणार ! adjust शिवसेनेकडून आमदार प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरकेंना उमेदवारी adjustदक्षिणमध्ये पाटील, महाडिकांनी घेतले अर्ज ! उत्तरसाठी अर्ज घेणाऱ्यांत व्ही.बी, सत्यजित कदम यांची नावे !! adjustदूध उत्पादकांसाठी खुशखबर, गोकुळतर्फे नवीन ४००० बायोगॅस मंजूर ! चेअरमन अरुण डोंगळे adjustप्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांंना ३५ हजार रुपयांचा दंड, ३०० किलो प्लॅस्टिक जप्त adjustराहुल आवाडे गुरुवारी अर्ज भरणार
1001157259
1001130166
1000995296
schedule23 Oct 24 person by visibility 91 categoryराजकीय
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली यामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री पवार हे बारामती मतदारसंघातून लढणार आहेत तर येवला मतदारसंघातून मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी  आहे. मंत्री दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे यांचाही पहिल्या यादीमध्ये समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मतदार संघातून मंत्री हसन मुश्रीफ यांना उमेदवारी जाहीर झाली. तर चंदगड विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार राजेश पाटील यांची उमेदवारी घोषित झाली. कागल मतदार संघामध्ये आता मंत्री मुश्रीफ यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून समरजितसिंह घाटगे अशी थेट लढत होणार आहे. तर चंदगड मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार राजेश पाटील यांच्या विरोधात महाविकास आघाडी कोणाला उमेदवारी देणार हे अद्याप ठरलेले नाही या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून नंदिनी बाभुळकर यांच्या नावाची चर्चा आहे. महाविकास आघाडीतील इतर स्थानिक नेते मंडळींनी एकत्र येऊन बाभुळकर यांना वगळून दुसऱ्यांना उमेदवारी द्या अशी मागणी केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार ठरविण्यावरुन पेच निर्माण झाला आहे.