Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
रामशेठ ठाकुरांनी दिली श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसला पंचवीस लाखाची देणगीमहात्मा फुलेंचा सार्वजनिक सत्यधर्म हा मानवी स्वातंत्र्याचा जाहीरनामा - प्राचार्य जी. पी. माळीजिल्हातंर्गत काँग्रेसमध्ये होणार फेरबदल, पदाधिकारी नेमणुकीसंदर्भात आढावा बैठकडॉ. बापूजी साळुंखे  इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये उलगडली भारतीय वायुदलातील करिअरची संधी  घोडावत ऑलिम्पियाड स्कूलचे डॉ.होमी भाभा परीक्षेत यशसक्तीच्या टीईटी परीक्षेतून सवलत मिळण्यासाठी खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार - खासदार धैर्यशील मानेआरोग्य विभागात साफसफाई ! जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर, सुप्रिया देशमुख निलंबित !!महामानवाच्या द्विजन्मशताब्दीचा सरकारला विसर ! क्रांतिबा जोतिबांचा वापर राज्यकर्त्यांकडून केवळ भाषणापुरताच ! !अशक्य ते शक्य करतात मुश्रीफ ! रामायणात दहा तोंडाचा रावण, बाजार समितीत अठरा तोंडाची रावणं !!कोल्हापूर बाजार समितीच्या सभापतिपदी नानासो कांबळे-साकेकर

जाहिरात

 

शहीद शिक्षण प्रसारक मंडळातर्फे निसर्गदूत पुरस्कार जाहीर, शनिवारी वितरण समारंभ

schedule06 Mar 26 person by visibility 538 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : पर्यावरण संवर्धन, वन्यजीव संरक्षण आणि निसर्गप्रेमाची जाणीव समाजात रुजवण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांना ‘निसर्गदूत पुरस्कार २०२६’ देऊन गौरविण्यात येणार आहे. हा पुरस्कार शहीद शिक्षण प्रसारक मंडळातर्फे प्रदान करण्यात येणार आहे. ७ मार्च २०२६ रोजी हा सन्मान सोहळा पार पडणार आहे. हा कार्यक्रम राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा येथील स्वप्नपरी सभागृह येथे सकाळी ११ वाजता होत आहे.

 पुरस्कार सोहळ्यात चांगुलपणाच्या चळवळीचे अध्यक्ष राज देशमुख आणि जागतिक शिक्षणतज्ज्ञ तसेच शहीद शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य मार्गदर्शक डॉ. जगन्नाथ पाटील यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील  यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

    यंदाच्या वर्षी  पत्रकार संदीप आडनाईक, बांबू रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक पाटलोबा पाटील, आपत्कालीन जीवरक्षक व माजी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी दिनकर कांबळे, जंगल अभ्यासक दत्ता मोरसे ,वृक्षमित्र वेलफेअर ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष अमोल बुढढे ,वन्यजीव अभ्यासक विजय पाटील,निसर्गमित्र अनिल चौगुले,निसर्गमित्र राणीता चौगुले, जीवरक्षक आणि निसर्ग संवर्धक बबिता जाधव  यांची ‘निसर्गदूत पुरस्कार २०२६’ साठी निवड करण्यात आली आहे. पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन, वन्यजीव अभ्यास, आपत्ती व्यवस्थापन तसेच समाजात पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यासाठी या सर्व मान्यवरांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात येत असल्याचे शहीद महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर यांनी सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes