Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
स्थायी समितीत महायुतीचा जय हो, सभापतीपदी भाजपचे विशाल शिराळे! राज्य कला प्रदर्शनात कोल्हापुरातील चित्रकारांच्या कलाकृतींची निवडज्ञानवत्सल स्वामींचे प्रेरणादायी भाषण, भारावलेले विद्यार्थी अन् जीवनात सफल होण्याचा सक्सेस मंत्रामहापालिकेतील अधीक्षक विलास साळोखेना लाच घेताना अटक करवीर पंचायत समितीवर महायुतीचा झेंडा ! सभापतिपदी राष्ट्रवादीचे साताप्पा पाटील, उपसभापतिपदी भाजपच्या दिपाली पाटील वालावलकर हायस्कूलचे शिक्षक राजेंद्र बनसोडे यांना  जाहीरगोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफांचा गडहिंग्लजमध्ये सत्कारअनुसूचित जाती आरक्षण बचाव समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत वेदा माळीला शंभरपैकी शंभर गुण, देशात अव्वल नगरसेविका, महिला अधिकारी क्रिकेटच्या मैदानावर! शिक्षिकेनही लुटला खेळाचा आनंद ! !

जाहिरात

 

सत्तेच्या गडबडीसाठी मुश्रीफांनी जनतेला फसविले, वापरा व फेका ही त्यांची निती - संजय मंडलिकांचा हल्लाबोल

schedule18 Nov 25 person by visibility 631 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘मंत्री हसन मुश्रीफांना तहहयात आमदार राहायचं. म्हणून ते प्रत्येकवेळी नवीन युती, आघाडी करत असतात. वापरा व फेका ही त्यांची निती आलहे. सत्तेच्या गडबडीसाठी ते जनतेला फसवित आहेत.’असा हल्लाबोल माजी खासदार संजय मंडलिक यांनी केला.

कागल नगरपालिका निवडणुकीत मंत्री मुश्रीफ व शाहू ग्रुपचे प्रमुख समरजितसिंह घाटगे यांच्यातील युतीच्या अनुषंगाने प्रसारमाध्यमातील प्रतिनिधींनी त्यांना प्रश्न केला असता ते मंडलिक म्हणाले, ‘मुश्रीफ मोठे होण्यात माजी खासदार सदाशिवराव मंडलिक, विक्रमसिंह घाटगे यांच्यासह अनेकांचे उपकार आहेत. यामुळे ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांची जाणीव मुश्रीफांनी ठेवावी. मात्र त्यांची निती ही वापरा व फेका या पद्धतीची आहे. जी पायरी चढून यश मिळवले, त्या पायरीलाच छाटायचे असा त्यांचा प्रयत्न असतो. महायुतीचे घटक पक्ष म्हणून युती संदर्भात त्यांचा फोन येईल, चर्चा होईल अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी सत्तेच्या गडबडीत जनतेला फसविले.

 मुश्रीफ व समरजितसिंह घाटगे यांच्या युतीमुळे मी एकटा पडलो नाही. तोंडघशीही पडलो नाही. कारण कागलमधील जनता माझ्यासोबत आहे. कागलमधील जनता सजग आहे. कागल नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदाच्या सगळया जागा शिवसेना लढविणार आहे. मुरगुडमध्ये आमची भाजपसोबत युती आहे. त्या ठिकाणी शिवसेनेचा नगराध्यक्ष होईल. दोन तीन दिवसात काय घडामोडी होतात पाहू, कागल नगरपालिका निवडणुकीतही जनता आमच्यासोबत आहे. कागलमध्ये नव्याने आकाराला आलेली आघाडी लोकांना आवडली नाही. त्यांची आघाडी ही काही आमच्यासाठी राजकीय भूकंप नाही. वास्तविक कागलमध्ये कोणताही गट असो, निर्णय घेत असताना कार्यकर्त्यांशी चर्चा करुनच पुढील धोरण ठरविले जाते. मात्र मुश्रीफांनी कसलीही चर्चा न करता आघाडी केल्याचे घोषित केले. नंतर माफीही मागितली म्हणतात. त्यांनी, सत्तेच्या गडबडीसाठी जनतेला फसविले.’अशा शब्दांत मंडलिकांनी मुश्रीफांवर निशाणा साधला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes