Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
आता चौथी-सातवीच्या वर्गासाठी शिष्यवृत्ती परीक्षा ! एकवेळची बाब म्हणून फेब्रुवारीत पाचवी-आठवीची परीक्षा !शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय महिला बास्केटाबॉलल स्पर्धेत तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी मुलींच्या संघास विजेतेपदसावित्रीबाई फुले रुग्णालयातील अतिदक्षता विभाग नऊ दिवस बंदनोव्हेंबर महिन्यापासून मुख्यमंत्री माझी शाळा - सुंदर शाळा टप्पा तीन अभियानसातव्या वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी, केएमटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड ! कामगारांनी मानले आमदारांचे आभार!! उपकुलसचिव वैभव ढेरे यांना पितृशोकशेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार न दिल्यास तीव्र आंदोलन – राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटीलआम्ही गोकुळच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठे केले, कोणाच्या जावईला नव्हे - सतेज पाटलांचा महाडिकांच्यावर हल्लाबोलतावडे हॉटेल कमानीचा धोकादायक भाग उतरविला, नवीन प्रवेशद्वारासाठी तीन कोटीचा निधी-राजेश क्षीरसागरथेट चाळीस टक्के डिबेंचर कपात करता, तालुका संपर्क सभेत त्याविषयी उत्पादकांना का सांगितले नाही ? शौमिका महाडिकांचा सवाल

जाहिरात

 

रुग्णांना तत्काळ स्थलांतरित करा, कोल्हापुरात पूरबाधित क्षेत्रातील पाच हॉस्पिटल्सना नोटिसा !

schedule20 Aug 25 person by visibility 320 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : संभाव्य पूरस्थिती विचारात घेऊन महापालिका प्रशासनाने शहरातील पाच मोठया हॉस्पिटल्सना रुग्ण स्थलांतरित करण्यासंदर्भात नोटिसा लागू केल्या आहेत. यामध्ये पूरबाधित क्षेत्रातील पाच हॉस्पिटल्सचा समावेश आहे. यामध्ये नागाळा पार्क, महावीर कॉलेज परिसरातील डायमंड सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, वेस्टर्न इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ न्युरोसायन्सेस (विन्स) हॉस्पिटल, अंतरंग हॉस्पिटल, स्वस्तिक हॉस्पिटल तसेच कदमवाडी येथील ॲपल सरस्वती हॉस्पिटल व्यवस्थापनला सूचना केल्या आहेत.

नोटिसमध्ये संबंधित रुग्णालयांना विद्यमान रुग्णांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचे आदेश आहेत. तसेच नव्या रुग्णांना दाखल करण्याच्या सूचना आहेत. या आदेशाचे पालन केल्यास रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित रुग्णालय प्रशासनावर राहणार असून, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असेही महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी पूरबाधित क्षेत्रातील नागरीकांनी पंचगंगा नदीची वाढती पाणीपातळी लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes