Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सोलापूरच्या डेप्युटी सीईओ स्मिता पाटील यांची कोल्हापूरला बदलीशंभर टक्के निधीवर सदस्य ठाम, ५० – ५० चा फॉर्म्युला अमान्य ! अध्यक्ष - सीईओंना गुरुवारी पत्र देणार, पदाधिकाऱ्यांची कोंडी ! ! गांधीनगरातील व्यापाऱ्यावर पाच हजारांचा दंड ; १४४ किलो प्लास्टिकचा साठा जप्तमानवकल्याणाचा भाव जागृतीसाठी विज्ञानाची दिशा प्रज्ञानाकडे नेण्याची गरज - डॉ. भूषण पटवर्धन महसूलमंत्र्यांच्या सोबत क्रीडाईच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक !  सातबारा – रेडीरेकनर - प्रॉपर्टी कार्डसंदर्भात सकारात्मक चर्चा ! !कंगना राणावतांच्या विरोधात कोल्हापुरात काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक, हाती घेतले चप्पलगोकुळचा निवडणूक कार्यक्रम तत्काळ सुरू करा : सर्किट बेंचचा आदेशसत्यशोधक इतिहास परिषदेतर्फे रविवारी अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनसाहित्यिक चंद्रकुमार नलगे यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात यावे : डॉ. सुनीलकुमार लवटे विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांच्या पतसंस्थेतर्फे दिवंगत सभासदाच्या वारसांना अर्थसहाय्य

जाहिरात

 

मिनी मंत्रालय ते मंत्रालय, जिल्हा परिषद सदस्य बनले आमदार ! राहुल आवाडे, अशोकराव माने विजयी !

schedule23 Nov 24 person by visibility 716 categoryमहानगरपालिका जिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्ह्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मावळत्या सभागृहातील दोन सदस्य मैदानात उतरले होते. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राहुल आवाडे हे विजयी झाले. हातकणंगले मतदारसंघातून जनसुराज्य शक्ती पक्षाचे अशोकराव माने यांनी निवडणूक जिकंली. मिनी मंत्रालय ते मंत्रालय असा त्यांचा प्रवास घडला.

हातकणंगलेतून दलितमित्र अशोकराव माने यांना १,३३, ६२७ इतकी मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार व काँग्रेसचे विद्यमान आमदार राजू आवळे यांना ८७,२९९ मते तर तिसऱ्या आघाडीचे उमेदवार व माजी आमदार सुजित मिणचेकर यांना २४,७६७ मते मिळाली. माने हे ४६,३२८ मतांनी विजयी झाले. या मतदारसंघात या तीन उमेदवारासह अपक्ष उमेदवार म्हणून वैभव कांबळे रिंगणात आहेत. येथे मतमोजणीच्या २४ झाल्या. माने यांनी प्रारंभापासून आघाडी घेतली. हातकणंगलेसाठी यंदा ७६.४५ टक्के मतदान झाले. एकूण २,६१, २१५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.येथे सोळा उमेदवार आहेत. 

इचलकरंजीत महायुतीकडून राहुल आवाडे व महाविकास आघाडीकडून मदन कारंडे यांच्यामध्ये प्रमुख लढत होती. या मतदारसंघात ६९.६८ टक्के मतदान झाले होते. २,१७,८५३ मतदारांनी मतदान केले आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडी व महायुतीच्या नेतेमंडळींनी सभा घेतल्या होत्या. इचलकरंजी मतदारसंघात मतमोजणीच्या एकूण वीस फेऱ्या होणार आहेत. महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे हे पहिल्या फेरीपासून आघाडीवर राहिले. प्रत्येक फेरीनिहाय त्यांच्या मतदानात वाढ होत गेली. या मतदारसंघात या निवडणुकीत राहुल आवाडे यांना एक लाख ३१ हजार ९१९ मते मिळाली. कारंडे यांना ७५ हजार १०८ मते तर विठ्ठल चोपडे यांना २४६१ मते मिळाली. आवाडे हे ५६,८११ मताधिक्क्यांनी विजयी झाले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes