Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
पोलिस ठाण्याच्या आवारातच लाच घेताना पोलिस अधिकाऱ्याला पकडलेशेतकऱ्यांच्यासोबत पिठलं भाकरी, चिखलगुठ्ठा करुन भात रोपांची लागण ! एक दिवस बळीराजासोबत !!कोल्हापुरात दर्जेदार वैद्यकीय शिक्षणासह रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा-मंत्री हसन मुश्रीफगोकुळमध्ये सहकार दिनानिमित्त विविध उपक्रम, बचत गटाच्या स्टॉलवर हजारोंची उलाढालशरद पवार पक्षाच्या मेळाव्याला हाऊसफुल्ल गर्दी !आगामी निवडणूक कार्यकर्त्यांची, आघाडीचे सर्वाधिकार जिल्हा पातळीवर हवेत !!सहकारातूनच मानवी जीवनाचा खऱ्या अर्थाने विकास : प्राचार्या वर्षा मैंदर्गीनूतन मराठी विद्यालय हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना रोटरी हेरिटेजचे बळराज्यातील एमफिल प्राध्यापकांना न्याय, पंचवीस वर्षाचा प्रश्न निकालीमार्केट यार्डातील व्यापार-व्यावसायिकांची सामाजिक बांधिलकी, स्वखर्चातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतकुंभार काम करणा-यांना महापालिकेचा परवाना आवश्यक

जाहिरात

 

मिनी मंत्रालय ते मंत्रालय, जिल्हा परिषद सदस्य बनले आमदार ! राहुल आवाडे, अशोकराव माने विजयी !

schedule23 Nov 24 person by visibility 316 categoryमहानगरपालिका जिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्ह्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मावळत्या सभागृहातील दोन सदस्य मैदानात उतरले होते. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राहुल आवाडे हे विजयी झाले. हातकणंगले मतदारसंघातून जनसुराज्य शक्ती पक्षाचे अशोकराव माने यांनी निवडणूक जिकंली. मिनी मंत्रालय ते मंत्रालय असा त्यांचा प्रवास घडला.

हातकणंगलेतून दलितमित्र अशोकराव माने यांना १,३३, ६२७ इतकी मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार व काँग्रेसचे विद्यमान आमदार राजू आवळे यांना ८७,२९९ मते तर तिसऱ्या आघाडीचे उमेदवार व माजी आमदार सुजित मिणचेकर यांना २४,७६७ मते मिळाली. माने हे ४६,३२८ मतांनी विजयी झाले. या मतदारसंघात या तीन उमेदवारासह अपक्ष उमेदवार म्हणून वैभव कांबळे रिंगणात आहेत. येथे मतमोजणीच्या २४ झाल्या. माने यांनी प्रारंभापासून आघाडी घेतली. हातकणंगलेसाठी यंदा ७६.४५ टक्के मतदान झाले. एकूण २,६१, २१५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.येथे सोळा उमेदवार आहेत. 

इचलकरंजीत महायुतीकडून राहुल आवाडे व महाविकास आघाडीकडून मदन कारंडे यांच्यामध्ये प्रमुख लढत होती. या मतदारसंघात ६९.६८ टक्के मतदान झाले होते. २,१७,८५३ मतदारांनी मतदान केले आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडी व महायुतीच्या नेतेमंडळींनी सभा घेतल्या होत्या. इचलकरंजी मतदारसंघात मतमोजणीच्या एकूण वीस फेऱ्या होणार आहेत. महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे हे पहिल्या फेरीपासून आघाडीवर राहिले. प्रत्येक फेरीनिहाय त्यांच्या मतदानात वाढ होत गेली. या मतदारसंघात या निवडणुकीत राहुल आवाडे यांना एक लाख ३१ हजार ९१९ मते मिळाली. कारंडे यांना ७५ हजार १०८ मते तर विठ्ठल चोपडे यांना २४६१ मते मिळाली. आवाडे हे ५६,८११ मताधिक्क्यांनी विजयी झाले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes