Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
काँग्रेसची पहिली यादी जाहीर, ४८ उमेदवारांची घोषणा ! सोळा नगरसेवकांना उमेदवारी !मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह भाजप नेत्यांच्यासोबत चर्चा ! दोन दिवसापूर्वी निवडणूक लढविण्याचा निर्णय ! !महापालिकेसाठी तिसरी आघाडी, शनिवारी शिक्कामोर्तब ! आप-वंचित अन् राष्ट्रवादी शरद पवार पक्ष एकवटले ! !महापालिका निवडणुकीसाठी आप - वंचितची आघाडी, लवकरच उमेदवारांची घोषणा दीपा अजित ठाणेकर महापालिका निवडणूक लढवणार काँग्रेसची पहिली यादी आज जाहीर होणार, तीस उमेदवारांची घोषणा शक्यशिक्षकांकडे मुलांकडील बुद्धिमत्ता-कौशल्ये ओळखण्याची कला हवी : सरोज पाटीलडीवाय पाटील अभियांत्रिकीच्या तीन विद्यार्थ्यांची प्रजासत्ताकदिन परेडसाठी निवड जिल्हा परिषद अध्यक्ष शालेय चषक क्रीडा स्पर्धेत राधानगरी तालुक्याला विजेतेपद ! करवीर, चंदगडचीही छाप ! !वारणा विद्यापीठातर्फे पन्हाळा मोहिमेतून महाराणी ताराबाईंच्या इतिहासाचा जागर

जाहिरात

 

कार्यकर्त्यांच्या मेहनतीने काँग्रेसमुक्त कोल्हापूर करण्यात भाजपला यश-नाथाजी पाटील

schedule26 Nov 24 person by visibility 875 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व च्या सर्व जागा जिंकण्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा मोलाचा वाटा आहे .त्यामुळेच कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस भुईसपाट झाली .भाजप मुक्त कोल्हापूर जिल्हा करणार अशी कोल्हेकुई करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना ही मोठी चपराक आहे .कोल्हापूर जिल्हा काँग्रेसमुक्त झाला.’असे मत भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी व्यक्त केले. 

. भारतीय जनता पार्टीच्या कोल्हापूर जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष यांच्या बैठकीत ते बोलत होते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबई येथे सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक घेतली व सर्व जिल्हाध्यक्षांचे अभिनंदन केले. दरम्यान भाजपच्या तालुकाध्यक्षांची बैठक मंगळवारी, कोल्हापूर जिल्हा कार्यालयामध्ये पार पडली.

पाटील म्हणाले, ‘ कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर, त्यांच्या पाठबळावर ,आणि त्यांनी केलेल्या अपार कष्टावर महायुतीचे सर्वच उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी झालेले आहेत . त्यामुळे भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करावे तितके थोडेच असून भविष्यकाळातील नगरपालिका जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणूक सामोरे जाण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच तयारी करावी.’
     .यावेळी जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा, सुशीला पाटील, प्रमोद कांबळे, महेश चौगुले, डॉ .सुभाष जाधव, राजेंद्र तराळे,संभाजी आरडे, दत्ता मेडशिंगे, विलास रणदिवे,  नामदेव चौगुले, एकनाथ पाटील, प्रीतम कापसे ,संतोष तेली,  शिवनगेक, मंदार परितकर, स्वप्निल शिंदे, अनिल पंढरे तालुकाध्यक्ष उपस्थित होते, डॉ. आनंद गुरव यांनी प्रास्ताविक केले, प्रकाश पाटील यांनी आभार मानले. 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes