Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
एसएनडीटी विभागीय युवा महोत्सव गाजविला शहीद वीरपत्नीच्या विद्यार्थिनींनी ! सोळा पदकांची कमाई !!शिवाजी विद्यापीठाचा सतीश काळसेकर पुरस्कार प्रभा गणोरकर, रवी कोरडे यांना जाहीरबिनविरोधच्या चर्चेत तथ्य नाही, गोकुळची निवडणूक ताकदीने लढवणार-  आमदार सतेज पाटीलउद्योग क्षेत्रातील नवीन संधीविषयी कोल्हापुरात दोन दिवसीय विशेष कार्यक्रमकिकवी खरेदी व्यवहाराची स्वतंत्रपणे ईडीमार्फत  चौकशी करा - राजवर्धन नाईक निंबाळकरसंच मान्यता  त्रुटी  दुरुस्तीसाठी शिक्षण उपंचालकांसोबत चर्चा कोल्हापूर फर्स्टतर्फे जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार ! कोल्हापुरात पश्चिम महाराष्ट्र विकास परिषद भरविणार !!डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या ६८ विद्यार्थ्यांना जॉब ऑफर्सतंत्रज्ञान युगात जीआयएसचे कौशल्य आत्मसात करणे आवश्यक : कुलगुरू  डी. टी. शिर्केमार्केट सेस चालूच राहणार, कोल्हापूर बाजार समितीचे राष्ट्रीय बाजार समितीत वर्गीकरण नाही - मंत्री जयकुमार रावळ

जाहिरात

 

हद्दवाढीला विरोधच, वीस गावात  बंद ! इंचभरही जमीन महापालिकेला देणार नाही !!

schedule17 Jun 25 person by visibility 435 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : प्रस्तावित हद्दवाढीच्या विरोधात कोल्हापूर शहरालगतच्या वीस गावात मंगळवारी (१७ जून २०२५) कडकडीत बंद पाळला. गावातील सर्व व्यवहार बंद होते. प्रमुख चौकात एकत्र येत ग्रामपंचायत सदस्यांनी हद्दवाढीला विरोध कायम राहील असा इशारा दिला. सरकारने, ग्रामीण भागातील जनतेच्या विरोधात जाऊन निर्णय घेतला तर आगामी स्वानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर बहिष्का टाकू. हद्दवाढीच्या विरोधात लढत राहू, एक इंचभरही जमीन महापालिकेला देणार नाही असा निर्धार हद्दवाढ विरोधी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

पाचगाव, कळंबा, मोरेवाडी, उचगाव, गडमुडशिंगी, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, गांधीनगर, वळीवडे, पीरवाडी,  आंबेवाडी, नागदेववाडी, शिये, नागाव, गोकुळ शिरगाव, पुलाची शिरोली, कळंबे तर्फे ठाणे, बालिंगा, वडणगे, शिंगणापूर या गावात बंद पाळण्यात आला. सकाळपासूनच गावातील सर्व दुकाने बंद होती. हद्दवाढीला विरोध दर्शविणारे फलक प्रमुख चौकात उभारले होते. वीस गावातील बंदच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त लावला होता. पुलाची शिरोली येथे काही तरुणांनी हद्दवाढीच्या विरोधात पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. ‘शोले’ सिनेमा स्टाइल झालेल्या आंदोलनामुळे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. प्रशासनाची धावपळ झाली. पोलिसांनी, हस्तक्षेप केल्यानंतर तरुण पाण्याच्या टाकीवरुन उतरले. हा प्रकार वगळता वीस गावात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दिवसभर बंद पाळण्यात आला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes