Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
भाषणबाजीत हरवला सिनेटमधील प्रश्नोत्तराचा तास ! मूळ विषयापेक्षा अवांतर चर्चा जास्त ! !सिनेट सदस्यांची विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शनेमहायुतीचा फॉर्म्युला ठरला ? २९ डिंसेबरपर्यंत उमेदवारांची घोषणा ! निवडणूक कामासाठी गैरहजर राहणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर फौजदारीसरोज पाटील यांना रत्नमाला घाळी नारीशक्ती पुरस्कार, २५ डिसेंबरला गडहिंग्लज येथे वितरणराष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे रविवारी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीशिवाजी विद्यापीठाचा ६२ वा दीक्षांत समारंभ बुधवारी !अक्षय जहागिरदारला राष्ट्रपती सुवर्णपदक, आर्या देसाईला कुलपती सुवर्णपदक ! !महायुती करणार इलेक्टिव्ह मेरीट उमेदवारांची चाचपणी, उपसमितीची स्थापनाआत्मनिर्भर भारत अंतर्गत फाऊंड्री क्षेत्राला उत्पादनवाढीसह नव्या बाजारपेठांची संधी-प्रदीप पेशकरएसटीच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत कोल्हापूर विभागाने पटकावले विजेतेपद, जळगावच्या संघाला उपविजेतेपद

जाहिरात

 

महायुती, महाविकासला पर्याय परिवर्तन आघाडी ! पुण्यात विविध संघटना नेत्यांची बैठक !!

schedule18 Jul 24 person by visibility 699 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आणि संघटना तयारी करत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीने निवडणूूक जिंकण्यासाठी आतापासूनच रणनिती आखत आहेत. दरम्यान विधानसभेच्या या निवडणुकीत लहानसहान पक्ष, विविध संघटना, सामाजिक संस्था यांना सोबत घेऊन महायुती आणि महाविकासला पर्याय म्हणून परिवर्तन आघाडी करण्याचा निर्धार करण्यात आला. यासंबंधी संघटना पदाधिकारी व नेते मंडळीची बैठक झाली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी परिवर्तन आघाडीसाठी पुढाकार घेतला आहे.
 पुणे येथे झालेल्या बैठकीत,    राज्यातील विविध शेतकरी प्रश्नासह होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमिवर इतर सर्व संघटना व छोट्या मोठ्या पक्षांना सोबत घेऊन परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून लढा उभारण्याचा निर्णय झाला. पुण्यातील  नवीन शासकीय विश्रामग्रह येथे झालेल्या या बैठकीला राज्यातील शेतकरी चळवळीतील मुख्य प्रवाहातील शेतकरी संघटनाच्या ज्येष्ठ नेत्यांची संयुक्त बैठक
   यावेळी परिवर्तन आघाडीच्यावतीने बेरोजगारी , वाढत्या शेतकरी आत्महत्या , सातत्याने पडत चाललेले शेतमालाचे दर ,कर्जाच्या बोजाखाली दबलेला शेतकरी , केंद्र सरकारचे चुकीचे आयात व निर्यात धोरण, दिवाळ खोरीच्या उंबरठ्यावर असलेली राज्याची आर्थिक स्थिती यासंबंधी चर्चा झाली. महायुती आणि महाविकासला पर्याय देण्यासाठी राज्यातील सामाजिक , आर्थिक , शैक्षणिक , व आरोग्य विषयक क्षेत्रामध्ये काम करणा-या सामाजिक संघटना यांना सोबत घेऊन  परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून एक सक्षम पर्याय देण्यावर शिक्कामोर्तब केले. या बैठकीस माजी आमदार वामनराव चटप , माजीं खासदार राजू शेट्टी , शंकर आण्णा धोंडगे, अनिल घनवट, ललित बहाळ, डॅा. महावीर अक्कोळे , योगेश पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
  परिवर्तन आघाडीतर्फे राज्यातील विविध संघटना व छोट्या मोठ्या पक्षांना सोबत घेऊन २८८ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. ३० जुलै रोजी औरंगाबाद येथे जागावाटप व पुढील धोरणाबाबत बैठक होणार आहे. 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes