Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूर इन्वेस्टर्स असोसिएशनतर्फे शनिवारी -  रविवारी मार्गदर्शन कार्यक्रमजिप प्रशासनाची कारवाई, विस्तार अधिकारी- कनिष्ठ सहाय्यक निलंबितस्थायीच्या सभेत आरोग्य विभागाच्या संथगतीच्या कामकाजाचा पंचनामा, विन्सोल कंपनी ब्लॅकलिस्टकोल्हापूरकरांचा प्रवास होणार वातानुकूलित बसमधून, सुरक्षित अन् सुखकर ! केएमटीच्या ताफ्यात ई बसेस दाखल, सप्टेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत ! !३०० गर्भपात, माजी सिवहिल सर्जन पोलिसांच्या ताब्यात ! कोल्हापुरात हॉस्पिटलवर धाड !!ज्ञानज्योती प्राचार्या शुभांगी गावडेंच्या जयंतीनिमित्त सोळांकूरमध्ये 'न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल' शाखेचे उदघाटन शेतकरी कर्ज आणि वीज बिल माफीमुळे बळीराजा आर्थिक संकटातून बाहेर शैक्षणिक, सामाजिक उपक्रमांनी ज्ञानज्योती प्राचार्या शुभांगी गावडे यांची जयंती साजरीजिल्हा परिषद सदस्य एकवटले, अध्यक्षांना दिले निवेदन ! स्थायीच्या सदस्यांचीही साथ !!माझ्याशी वाकडं- नदीवर लाकडं ! आयुक्तांच्या विधानाची नगरसेवकांनी केली मंत्र्यांच्याकडे तक्रार !!

जाहिरात

 

महायुती, महाविकासला पर्याय परिवर्तन आघाडी ! पुण्यात विविध संघटना नेत्यांची बैठक !!

schedule18 Jul 24 person by visibility 869 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आणि संघटना तयारी करत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीने निवडणूूक जिंकण्यासाठी आतापासूनच रणनिती आखत आहेत. दरम्यान विधानसभेच्या या निवडणुकीत लहानसहान पक्ष, विविध संघटना, सामाजिक संस्था यांना सोबत घेऊन महायुती आणि महाविकासला पर्याय म्हणून परिवर्तन आघाडी करण्याचा निर्धार करण्यात आला. यासंबंधी संघटना पदाधिकारी व नेते मंडळीची बैठक झाली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी परिवर्तन आघाडीसाठी पुढाकार घेतला आहे.
 पुणे येथे झालेल्या बैठकीत,    राज्यातील विविध शेतकरी प्रश्नासह होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमिवर इतर सर्व संघटना व छोट्या मोठ्या पक्षांना सोबत घेऊन परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून लढा उभारण्याचा निर्णय झाला. पुण्यातील  नवीन शासकीय विश्रामग्रह येथे झालेल्या या बैठकीला राज्यातील शेतकरी चळवळीतील मुख्य प्रवाहातील शेतकरी संघटनाच्या ज्येष्ठ नेत्यांची संयुक्त बैठक
   यावेळी परिवर्तन आघाडीच्यावतीने बेरोजगारी , वाढत्या शेतकरी आत्महत्या , सातत्याने पडत चाललेले शेतमालाचे दर ,कर्जाच्या बोजाखाली दबलेला शेतकरी , केंद्र सरकारचे चुकीचे आयात व निर्यात धोरण, दिवाळ खोरीच्या उंबरठ्यावर असलेली राज्याची आर्थिक स्थिती यासंबंधी चर्चा झाली. महायुती आणि महाविकासला पर्याय देण्यासाठी राज्यातील सामाजिक , आर्थिक , शैक्षणिक , व आरोग्य विषयक क्षेत्रामध्ये काम करणा-या सामाजिक संघटना यांना सोबत घेऊन  परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून एक सक्षम पर्याय देण्यावर शिक्कामोर्तब केले. या बैठकीस माजी आमदार वामनराव चटप , माजीं खासदार राजू शेट्टी , शंकर आण्णा धोंडगे, अनिल घनवट, ललित बहाळ, डॅा. महावीर अक्कोळे , योगेश पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
  परिवर्तन आघाडीतर्फे राज्यातील विविध संघटना व छोट्या मोठ्या पक्षांना सोबत घेऊन २८८ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. ३० जुलै रोजी औरंगाबाद येथे जागावाटप व पुढील धोरणाबाबत बैठक होणार आहे. 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes