+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustशिरोली दुमालातील मैदानात २०० मल्लांचा सहभाग, सुदर्शन कोतकर विजयी adjustविवेकानंदच्या ग्रंथालयास विस्ड्म-गबुला फाऊंडेशनकडून ग्रंथ भेट adjustआरोग्य सेवा निर्देशांकामध्ये कोल्हापूर महापालिका राज्यामध्ये अव्वल adjustपालकमंत्र्यांच्या एजंटरुपी कार्यकर्त्यांचा रस्ते कामाच्या ठेक्यासाठी दबाव ! कृती समितीने केली विचारणा adjustरस्तेप्रश्नी पालकमंत्र्यांकडून आयुक्त- शहर अभियंत्यांची कानउघाडणी adjustप्रा. प्रविण माने यांना पीएचडी adjustमंगळवार पेठेत अवैध सिलेंडर रिफिलिंग सेंटरवर कारवाई adjustपाचगाव, कळंबा, गांधीनगरसह सात ग्रामपंचायतींना नोटीसा adjust विधायक उपक्रमांनी प्रविण कोडोलीकर यांचा वाढदिवस साजरा adjustशुक्रवारपासून तीन दिवसीय बसव व्याख्यानमाला
1000309877
Screenshot_20240226_195247~2
schedule04 May 24 person by visibility 140 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : खासदार संजय मंडलिक हे समरजितसिंह घाटगे यांना जनक घराण्याचे वंशज आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना विचारांचे वारसदार असे सांगत सुटले आहेत, मग उद्याच्या विधानसभा निवडणुकीत तुम्ही नक्की कोणाबरोबर असणार, मुश्रीफांचा प्रचार करणार की समरजितराजे घाटगेंचा ? याचा प्रथम खुलासा करावा असा सवाल माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी खासदार मंडलिक यांना केला.  
कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ सावडे बुद्रुक तालुका कागल येथे जाहीर सभेत बोलत होते अध्यक्षस्थानी महादेव अस्वले हे होते..
मालोजीराजे छत्रपती पुढे , ज्यांनी संसदेत कधीही तोंड उघडले नाही.एखादा मोठा प्रोजेक्ट कोल्हापूर जिल्ह्यात आणला नाही. ज्यांना स्वतःचाच दूध संघ विकावा लागला. कारखान्यावर कर्ज वाढले कर्ज काढून कर्मचाऱ्यांचे पगार द्यायची वेळ आली .ज्यांना कारखान्याची शेवटची संचालक मंडळाची बैठक कधी झाली हे आठवत नाही .ज्यांनी नुकत्याच झालेल्या बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत ज्यांच्या कबरी बांधायची भाषा केली त्यांच्याच हातात हात घालून मतांसाठी फिरत आहेत अशा निष्क्रिय खासदार संजय मंडलिक यांची निष्क्रिय कारकीर्द बदलवायची हीच वेळ आहे 
माजी आमदार संजय घाटगे म्हणाले, भाजपचे सरकार हे केवळ उद्योगपतींसाठीच काम करताना दिसत आहे जुन्या संसदेत कामकाज करणारा तिसऱ्यांदा पंतप्रधान होत नाही असे भाकीत कुणीतरी सांगितले म्हणून गोमुख संसद 20 हजार कोटी खर्चून बांधण्यात आली असे अंधश्रद्धा जातीयता समाजात तेढ निर्माण करणारे हे भाजप सरकार आणि त्यांची संस्कृती आत्ताच संपवण्याची गरज आहे 
गोकुळचे संचालक अंबरीश घाटगे,  वंचितचे राज कांबळे, कॉम्रेड शिवाजी मगदूम, विकास पाटील, शिवानंद माळी आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी नाना कांबळे, उमाजी पाटील, सागर कोंडेकर, हळदीचे व्हरंबळे मधुकर भोसले आदी प्रमुख उपस्थित होते.  सुभाष पाटील यांनी सूत्रसंचालन केले. एस .टी. चव्हाण यांनी आभार मानले .