Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
इच्छुकांची स्थायीसाठी तयारी, माधुरी किरण नकातेनी घेतली आमदारांची भेट कॉलेजने केले अर्थसहाय्य, राष्ट्रीय स्पर्धेत विद्यार्थ्याकडून केआयटीचा डंकाघोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान डॉ. राजेश ख्यालप्पा यांना एफआयसीपी फेलोशिपसचिन पाटलांच्या उमेदवारीला मिळतेय मतदारांची पसंती, तरुण नेतृत्वात विकासकामाची धडाडीहाऊसफुल्ल गर्दीत दालनचा समारोप ! १०० फ्लॅट, ५० प्लॉटसाठी बुकिंग! लिफ्ट पार्किंगची नोंदणी !!मेरी वेदर मैदानावर तेरा फेब्रुवारीपासून भीमा कृषी प्रदर्शनमहापौर-उपमहापौरपदाचे उमेदवार ठरले !  सभागृहात महायुतीच्या विरोधात काँग्रेस लढणार! !काँग्रेस लढणार महापौर- उपमहापौरपदाची निवडणूक ! सचिन शेंडे, दुर्वास कदम उमेदवार !!शिक्षणाचा कोल्हापूर मनपा पॅटर्न राज्यात भारी ! शिष्यवृत्तीची रक्कम पाच हजार करणारी एकमेव महापालिक!!

जाहिरात

 

    २०१३ पूर्वीच्या शिक्षकांना टीईटीमधून सवलतीसाठी सरकार सकारात्मक- शिक्षणमंत्री दादा भुसे

schedule16 Sep 25 person by visibility 21714 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : २०१३ पूर्वी शिक्षक पदावर रुजू झालेले शिक्षकांना टी.ई.टी. परीक्षेतून सवलत मिळावी यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे.  याबाबत केंद्र सरकारकडे आवश्यक तो पाठपुरावा करू असे आश्वासन शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळास दिले. संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील व राज्य सरचिटणीस हरीश ससनकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंत्री भुसे यांची भेट घेतली. टीईटी परीक्षा अनिवार्य करणे चुकीचे असल्याचे सांगितले. तसेच संघटनेच्या मागणीनुसार शंभर टक्के विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व गणवेश खरेदीचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीस दिल्याबद्दल सरकारचे आभार मानले.

  संघटनेने, यावेळी बी.एल.ओ.च्या कामाचा शिक्षकांना प्रचंड त्रास होत असून हे फक्त शिक्षकाला दिले जाते बाकी कर्मचाऱ्यांना वगळले जात आहे हा मुद्दा मांडला त्यावर मंत्री भुसे यांनी निवडणूक आयोगाकडे शिक्षकांकडील हे काम कमी करण्यासाठी चर्चा करू असे सांगितले. शिक्षण सेवक पद रद्द करावे, जिल्हा परिषद सर्वच शाळांना शंभर पटास मुख्याध्यापक पद मंजूर व्हावे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इयत्ता  पाचवी व आठवी चे वर्ग विना अट जोडावेत, कार्यरत शंभर  विषय शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करावी यासह विविध मागण्यासंबंधी चर्चा केली. शिष्टमंडळात राज्य कोषाध्यक्ष जी. एस. मंगनाळे, राज्य संघटक पी.आर . पाटील, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष एस के.पाटील, वाशिम जिल्हाध्यक्ष इरफान मिर्झा, प्रदीप गावंडे, भाऊराव शिंदे, प्रमोद मुक्केमवार, गोंदिया जिल्हाध्यक्ष हरिराम येळणे, अमरावती कार्याध्यक्ष गोकुळ चारथळ, नितीन पेंढेकर, विजय सावळे उपस्थित होते.
 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes