Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
राज्य कला प्रदर्शनात कोल्हापुरातील चित्रकारांच्या कलाकृतींची निवडज्ञानवत्सल स्वामींचे प्रेरणादायी भाषण, भारावलेले विद्यार्थी अन् जीवनात सफल होण्याचा सक्सेस मंत्रामहापालिकेतील अधीक्षक विलास साळोखेना लाच घेताना अटक करवीर पंचायत समितीवर महायुतीचा झेंडा ! सभापतिपदी राष्ट्रवादीचे साताप्पा पाटील, उपसभापतिपदी भाजपच्या दिपाली पाटील वालावलकर हायस्कूलचे शिक्षक राजेंद्र बनसोडे यांना  जाहीरगोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफांचा गडहिंग्लजमध्ये सत्कारअनुसूचित जाती आरक्षण बचाव समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत वेदा माळीला शंभरपैकी शंभर गुण, देशात अव्वल नगरसेविका, महिला अधिकारी क्रिकेटच्या मैदानावर! शिक्षिकेनही लुटला खेळाचा आनंद ! !महापालिकेतील रिक्त जागांच्या भरतीप्रश्नी काँग्रेस आक्रमक, गुरुवारपासून साखळी उपोषण

जाहिरात

 

शहीद महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे कौलवमध्ये विशेष श्रम संस्कार शिबीर

schedule20 Jan 26 person by visibility 156 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : राधानगरी तालुक्यातील तिटवे येथील शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे  (एनएसएस) हिवाळी कौलव येथे झाले. यामध्ये शंभर  विद्यार्थीनीं सहभागी झाल्या होत्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होत ‘शहीद’ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थिनींनी सामाजिक बांधिलकी जोपासत उल्लेखनीय कार्य केले. गावकऱ्यांसाठी स्वच्छता मोहीम, आरोग्य जनजागृती, सेंद्रिय शेतीविषयक उपक्रम आणि साक्षरता अभियान राबवले. कॅम्प समन्वयन प्रा. अविनाश पालकर, प्रा. सुप्रिया पाटील,निकिता पाटील आदींनी केले. राशिवडे बुद्रुक गावचे  सरपंच,उपसरपंच, सदस्य    आदीनी परिश्रम घेतले.

शिबीर कालावधीत विविध विषयावर व्याख्याने झाली. तसेच   विद्यार्थ्यांमधील सोशल मीडिया वापर व त्याचा परिणाम याविषयी सर्वेक्षण केले.  राधानगरी तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव यांचे जलसंधारण पर्यावरण संवर्धन व संरक्षण काळाची गरज यावर व्याख्यान झाले. मोफत रक्तगट तपासणी शिबिर झाले.  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पोवार यांचे नैसर्गिक शेती काळाची गरज याविषयी व्याख्यान  झाले. महिलांसाठी  हळदीकुंकू, फनी गेम्स ,पाककला स्पर्धा घेण्यात आल्या.व्याख्याते संदीप पवार यांनी ‘पाणी आहे तर उद्या आहे उद्या आहे तर जीवन आहे’ यासंबंधी मार्गदर्शन केले. श्री साई ब्लड बँक गारगोटी यांनी रक्तदान शिबीर पार पडले. स्वप्निल पवार यांचे जल व्यवस्थापन जनजागृतीविषयी व्याख्यान झाले. शिबीर यशस्वी होण्यासाठी  शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर, कौलव गावचे सरपंच, उपसरपंच व सदस्य, ग्रामसेवक व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes