Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोखले कॉलेजमध्ये वादविवाद स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, विजेत्यांना बक्षीस प्रदानप्राचार्य डॉ. धनाजी कणसे, डॉ. आर. आर. कुंभार, प्रा. अरुण पाटील, प्रा. गजानन माळी यांना राज्य सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कारनगरसेवक हमरीतुमरीवर, प्रशासनाचा मोठा निर्णय ! महापालिकेची गुरुवारची सर्वसाधारण सभा होणार पोलिस बंदोबस्तात ! !ज्ञानपीठ विजेते लेखक वि.स. खांडेकर हे मानवी जीवनाचे भाष्यकार, त्यांच्या साहित्याची प्रासंगिकता काळाच्या पुढे - डाॅ. भालचंद्र मुणगेकरखाजगी प्राथमिक शिक्षक सेवक  पतसंस्थेच्या चेअरमनपदी रोहिणी येडगे, व्हाइस चेअरमनपदी चेअरमनपदी शिवाजी सोनाळकर कोल्हापुरात मंत्र्यांच्या समर्थकांची अधिकाऱ्यांवर दमबाजी ! कार्यालय पेटवण्याची, बुटाने मारण्याची धमकी ! !डी वाय पाटील व्यवस्थापन विभाग विद्यार्थ्यांचा देशी वृक्ष प्रजातींच्या संवर्धनासाठी पुढाकारकार्यालयात नगरसेवकांची भांडणे, चौकात कार्यकर्ते आमनेसामने! महापालिकेचा बनतोय आखाडा, पदाधिकारी म्हणतात हा कौटुंबिक वाद !!आयुक्तांच्या कार्यालयातच शारंगधर देशमुख - आदिल फरास एकमेकांना भिडले !  चौकात कार्यकर्ते जमले, पोलिसांचा हस्तक्षेप- नेत्यांची फोनाफोनी!!शिक्षक मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी मला मिळेल, रविवारी प्रचाराचा शुभारंभ करणार - मंगेश चिवटे

जाहिरात

 

कुस्ती अन् बैलगाडी शर्यतीवर आधारित रांगडा आजपासून प्रदर्शित

schedule12 Jul 24 person by visibility 832 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कुस्ती आणि बैलगाडी शर्यत ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख. दोन्हीही रांगडे खेळ. ग्रामीण पार्श्वभूमी लाभलेले. या दोन्हीची सांगड घालत निर्माण झालेला रांगडा हा सिनेमा बारा जुलै २०२४ पासून थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे.
 प्रदर्शनापूर्वीच सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. प्रेमकथा, राजकारणाच्या सोबतीला अॅक्शनचा धमाका या सिनेमात पाहावयास मिळणार आहे. हा सिनेमा नक्कीच लोकांना आवडेल असा विश्वास या सिनेमाच्या टीमने व्यक्त केला. या सिनेमात दोन राष्ट्रीय कुस्तीपटूंच्या प्रमुख भूमिका आहेत.या सिनेमात भूषण शिवतारे, मयुरी नव्हाते, अमोल लंक, भीमराज धनापुणे, आतिक मुजावर, संदीप रासकर, राजेंद्र गुंजाळ, पल्लवी चव्हाण, निकिता पेठकर, निलेश कवाद यांच्या भूमिका आहेत. शेतकरी पुत्र प्रॉडक्शनची निर्मिती आहे. योगेश बालवडकर, किरण फाटे, राहुल गव्हाणे, मच्छिंद्र लंके, अब्बास मुजावर अणि आयुब हवालदार यांनी संयुक्तपणे या सिनेमाची निर्मिती केली आहे. कथा आणि दिग्दर्शकआयुब हवालदार यांनी केले आहे. दीपक ठुबे हे संवादलेखक आहेत.
सिनेमाच्या प्रमोशनसाठी कलाकार आणि तंत्रज्ञाची टीम नुकतीच कोल्हापूरला आली होती. याप्रसंगी त्यांनी सिनेमाचे वेगळेपण, कुस्ती आणि बैलगाडी शर्यतीचा छंद, त्यातून घडणारे कथानक याविषयी सांगत सिनेमाची उत्कंठा वाढविली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes