Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोखले कॉलेजमध्ये वादविवाद स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, विजेत्यांना बक्षीस प्रदानप्राचार्य डॉ. धनाजी कणसे, डॉ. आर. आर. कुंभार, प्रा. अरुण पाटील, प्रा. गजानन माळी यांना राज्य सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कारनगरसेवक हमरीतुमरीवर, प्रशासनाचा मोठा निर्णय ! महापालिकेची गुरुवारची सर्वसाधारण सभा होणार पोलिस बंदोबस्तात ! !ज्ञानपीठ विजेते लेखक वि.स. खांडेकर हे मानवी जीवनाचे भाष्यकार, त्यांच्या साहित्याची प्रासंगिकता काळाच्या पुढे - डाॅ. भालचंद्र मुणगेकरखाजगी प्राथमिक शिक्षक सेवक  पतसंस्थेच्या चेअरमनपदी रोहिणी येडगे, व्हाइस चेअरमनपदी चेअरमनपदी शिवाजी सोनाळकर कोल्हापुरात मंत्र्यांच्या समर्थकांची अधिकाऱ्यांवर दमबाजी ! कार्यालय पेटवण्याची, बुटाने मारण्याची धमकी ! !डी वाय पाटील व्यवस्थापन विभाग विद्यार्थ्यांचा देशी वृक्ष प्रजातींच्या संवर्धनासाठी पुढाकारकार्यालयात नगरसेवकांची भांडणे, चौकात कार्यकर्ते आमनेसामने! महापालिकेचा बनतोय आखाडा, पदाधिकारी म्हणतात हा कौटुंबिक वाद !!आयुक्तांच्या कार्यालयातच शारंगधर देशमुख - आदिल फरास एकमेकांना भिडले !  चौकात कार्यकर्ते जमले, पोलिसांचा हस्तक्षेप- नेत्यांची फोनाफोनी!!शिक्षक मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी मला मिळेल, रविवारी प्रचाराचा शुभारंभ करणार - मंगेश चिवटे

जाहिरात

 

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीचे प्रस्ताव पात्र

schedule19 Sep 24 person by visibility 846 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक नुकतीच झाली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस व अन्य अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांता सरकारी मदत देण्यासंबंधीचे दोन प्रस्ताव होते. पन्हाळा तालुक्यातील कारवे येथील संदीप निवास खामकर व शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील कुमार बाबू पोवार या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख रुपये मदतीचे प्रस्ताव पात्र ठरविले. हा प्रस्ताव सरकारकडे पाठवून रितसर प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
साधारणपणे महिना ते दीड महिन्याच्या आत संबंधित शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळणार आहे. एक लाख रुपयांपैकी 30 हजार रुपये लाभार्थ्याच्या बँक खात्यात टाकले जातात आणि 70 हजार रुपये मासिक प्राप्ती योजनेमध्ये लाभार्थ्याच्या नावे बँकेत ठेवले जातात.असे जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागातील तहसिलदार विजय पवार यांनी सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes