Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळकडून म्हैस - गाय दूध खरेदी दरात वाढराखीव कर्मचारी निवडणूक भत्ता : लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित शाश्वत विकास म्हणजे सर्वांगीण विकास होय  : डॉ. यशवंत थोरातअहिंसा-सत्य -अस्तेय ही मूल्ये आजच्या समाजाची अपरिहार्य गरज — डॉ. सुषमा रोटेउदंड होणार नगरसेवक, नावापुढे पद -शहरासाठी योगदानाचे काय ? स्वीकृतच्या पदाचीही खांडोळी ! !कास्ट्राईब कर्मचारी कल्याण संघटनेतर्फे शिवजयंती उत्साहात साजरीडीवाय पाटील हॉस्पिटल, अभियांत्रिकी प्रेसिडेंट कप क्रिकेट स्पर्धेचे विजेतेराजर्षी शाहू जन्मस्थळ संग्रहालयाचा शनिवारी लोकार्पण सोहळावाढदिवसाला विधायक उपक्रमांची जोड, सुरेंद्र जैन यांचा आदर्शवत पायंडानिसर्गाची हानी न करता केलेला विकास हा खऱ्या अर्थाने शाश्वत विकास – कुलसचिव व्ही. एन. शिंदे

जाहिरात

 

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीचे प्रस्ताव पात्र

schedule19 Sep 24 person by visibility 503 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक नुकतीच झाली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस व अन्य अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांता सरकारी मदत देण्यासंबंधीचे दोन प्रस्ताव होते. पन्हाळा तालुक्यातील कारवे येथील संदीप निवास खामकर व शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील कुमार बाबू पोवार या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख रुपये मदतीचे प्रस्ताव पात्र ठरविले. हा प्रस्ताव सरकारकडे पाठवून रितसर प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
साधारणपणे महिना ते दीड महिन्याच्या आत संबंधित शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळणार आहे. एक लाख रुपयांपैकी 30 हजार रुपये लाभार्थ्याच्या बँक खात्यात टाकले जातात आणि 70 हजार रुपये मासिक प्राप्ती योजनेमध्ये लाभार्थ्याच्या नावे बँकेत ठेवले जातात.असे जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागातील तहसिलदार विजय पवार यांनी सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes