Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
बिनविरोधच्या चर्चेत तथ्य नाही, गोकुळची निवडणूक ताकदीने लढवणार-  आमदार सतेज पाटीलउद्योग क्षेत्रातील नवीन संधीविषयी कोल्हापुरात दोन दिवसीय विशेष कार्यक्रमकिकवी खरेदी व्यवहाराची स्वतंत्रपणे ईडीमार्फत  चौकशी करा - राजवर्धन नाईक निंबाळकरसंच मान्यता  त्रुटी  दुरुस्तीसाठी शिक्षण उपंचालकांसोबत चर्चा कोल्हापूर फर्स्टतर्फे जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार ! कोल्हापुरात पश्चिम महाराष्ट्र विकास परिषद भरविणार !!डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या ६८ विद्यार्थ्यांना जॉब ऑफर्सतंत्रज्ञान युगात जीआयएसचे कौशल्य आत्मसात करणे आवश्यक : कुलगुरू  डी. टी. शिर्केमार्केट सेस चालूच राहणार, कोल्हापूर बाजार समितीचे राष्ट्रीय बाजार समितीत वर्गीकरण नाही - मंत्री जयकुमार रावळ सार्वजनिक कार्यक्रमात अश्लिल - आक्षेपार्ह नृत्य सादरीकरणास प्रतिबंध करा - कलापथक निर्माता असोसिएशनराज्यस्तरीय तेली समाजाच्या व्यासपीठावर मंत्री बावनकुळे - विजय वडेट्टीवारांच्यामध्ये राजकीय जुगलबंदी ! पक्ष प्रवेशाची ऑफर, एक नंबर मंत्रीपदासाठी शुभेच्छा!!

जाहिरात

 

बिद्री कारवाईच्या निषेधार्थ गारगोटीत मोर्चा, आबिटकरांविरोधात घोषणा

schedule09 Jul 24 person by visibility 806 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : श्री दूधगंगा –वेदगंगा सहकारी साखर कारखान्यावरील (बिद्री) कारवाईवरुन चेअरमन माजी आमदार के. पी. पाटील आणि आमदार प्रकाश आबिटकर यांच्यातील संघर्ष वाढताना दिसत आहे. माजी आमदार पाटील समर्थकांनी बिद्रीवरील कारवाईवरुन आबिटकरांना घेरण्याची एकही संधी दवडताना दिसत नाहीत. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सभासद व शेतकऱ्यांचा गारगोटीत मोर्चा काढण्यात आला. तहसिलदारांना निवेदन दिले. या मोर्चात आबिटकरांवर टीका करणारे फलक आणि त्यांच्या विरोधात घोषणाबाजी झाली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारखान्यावर केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ मोर्चाचे आयोजन केले होते. हुतात्मा चौकातून मोर्चा निघाला. तहसलिदार कार्यालयासमोर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. याप्रसंगी बोलताना कारखान्याचे चेअरमन के. पी. पाटील यांनी आमदार प्रकाश आबिटकर यांच्यावर टीकास्त्र सोडले. पाटील म्हणाले, ‘आमदार आबिटकर हे कारखान्याच्या प्रगतीत खोडा घालत आहेत. या आमदारांना येत्या निवडणुकीत जनता धडा शिकवेल.’ याप्रसंगी कारखान्याचे संचालक व भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी कारखान्यावरील कारवाई मागे घ्यावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. शेखर देसाई, रामभाऊ कळबेकर, संदीप देसाई, सर्जेराव देसाई यांची भाषणे झाली. आंदोलनात कारखान्याचे संचालक सत्यजित जाधव, मधुकर देसाई, पंडितराव केणे, सम्राट मोरे, जगदीश पाटील, प्रकाश देसाई, शामराव देसाई, सरपंच प्रकाश वास्कर, अनिल तळकर, एस. एम. पाटील, एम. डी. पाटील, पांडूरंग कदम, सुनील कांबळे, विश्वनाथ कुंभार आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes