Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
मुश्रीफांनी जाहीर केलेल्या गोकुळच्या ठराव संख्येवरून भाजपच्या नेत्यांना मिरचीचा ठसका का लागला ? युवराज पाटील हसन मुश्रीफांचे भाजपला थेट चॅलेंज ! गोकुळसाठी कोल्हापुरात ठरावांची बेरीज, पदवीधर आमदारकीसाठी सांगलीत शड्डू !!जिल्हा परिषदेत गणरायाची प्रतिष्ठापना !  सदस्य - पदाधिकाऱ्यांचा पुढाकार, आरतीला मंत्र्यांची उपस्थिती ! !आनंदराव पाटील- चुयेकरांच्या समाधीला माजी संचालकांचे अभिवादनगोकुळच्या जागा वाटपावरुन महायुतीत वादाचे फटाके! मंत्री मुश्रीफ हे भाजपची ताकत गौण असल्याचा संदेश देत आहेत का? खासदार महाडिकांचा सवालडॉ. शिवशंकर मारजक्के यांचा अॅवार्ड ऑफ एक्सलन्सने सन्मानशिक्षकांचा सन्मान की निवडणुकीचा शो ?जनसुराज्य शक्तीचे नवे पदाधिकारी, युवक जिल्हाध्यक्षपदी अक्षय जरग ! शहराध्यक्षपदी शेखर जाधव, माजी नगरसेवक आर.डी.पाटील जनसुराज्यमध्ये ! !अचानक शाळा भेटी ! पायाभूत सुविधा, गुणवत्तेची तपासणी ! !कौस्तुभ गावडेंची भूमिका शिक्षकहिताची, त्यांच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री, पार्लमेंटरी बोर्डाकडे आग्रह धरणार - खासदार धनंजय महाडिक

जाहिरात

 

बिद्री कारवाईच्या निषेधार्थ गारगोटीत मोर्चा, आबिटकरांविरोधात घोषणा

schedule09 Jul 24 person by visibility 858 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : श्री दूधगंगा –वेदगंगा सहकारी साखर कारखान्यावरील (बिद्री) कारवाईवरुन चेअरमन माजी आमदार के. पी. पाटील आणि आमदार प्रकाश आबिटकर यांच्यातील संघर्ष वाढताना दिसत आहे. माजी आमदार पाटील समर्थकांनी बिद्रीवरील कारवाईवरुन आबिटकरांना घेरण्याची एकही संधी दवडताना दिसत नाहीत. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सभासद व शेतकऱ्यांचा गारगोटीत मोर्चा काढण्यात आला. तहसिलदारांना निवेदन दिले. या मोर्चात आबिटकरांवर टीका करणारे फलक आणि त्यांच्या विरोधात घोषणाबाजी झाली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारखान्यावर केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ मोर्चाचे आयोजन केले होते. हुतात्मा चौकातून मोर्चा निघाला. तहसलिदार कार्यालयासमोर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. याप्रसंगी बोलताना कारखान्याचे चेअरमन के. पी. पाटील यांनी आमदार प्रकाश आबिटकर यांच्यावर टीकास्त्र सोडले. पाटील म्हणाले, ‘आमदार आबिटकर हे कारखान्याच्या प्रगतीत खोडा घालत आहेत. या आमदारांना येत्या निवडणुकीत जनता धडा शिकवेल.’ याप्रसंगी कारखान्याचे संचालक व भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी कारखान्यावरील कारवाई मागे घ्यावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. शेखर देसाई, रामभाऊ कळबेकर, संदीप देसाई, सर्जेराव देसाई यांची भाषणे झाली. आंदोलनात कारखान्याचे संचालक सत्यजित जाधव, मधुकर देसाई, पंडितराव केणे, सम्राट मोरे, जगदीश पाटील, प्रकाश देसाई, शामराव देसाई, सरपंच प्रकाश वास्कर, अनिल तळकर, एस. एम. पाटील, एम. डी. पाटील, पांडूरंग कदम, सुनील कांबळे, विश्वनाथ कुंभार आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes