+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustविवेकानंदच्या ग्रंथालयास विस्ड्म-गबुला फाऊंडेशनकडून ग्रंथ भेट adjustआरोग्य सेवा निर्देशांकामध्ये कोल्हापूर महापालिका राज्यामध्ये अव्वल adjustपालकमंत्र्यांच्या एजंटरुपी कार्यकर्त्यांचा रस्ते कामाच्या ठेक्यासाठी दबाव ! कृती समितीने केली विचारणा adjustरस्तेप्रश्नी पालकमंत्र्यांकडून आयुक्त- शहर अभियंत्यांची कानउघाडणी adjustप्रा. प्रविण माने यांना पीएचडी adjustमंगळवार पेठेत अवैध सिलेंडर रिफिलिंग सेंटरवर कारवाई adjustपाचगाव, कळंबा, गांधीनगरसह सात ग्रामपंचायतींना नोटीसा adjust विधायक उपक्रमांनी प्रविण कोडोलीकर यांचा वाढदिवस साजरा adjustशुक्रवारपासून तीन दिवसीय बसव व्याख्यानमाला adjustदेश घडवणारा अभियंता व्हा : आमदार विनय कोरे
1000309877
Screenshot_20240226_195247~2
schedule01 May 24 person by visibility 77 categoryजिल्हा परिषद
शाहू महाराजांच्या आडून तयार होत असलेल्या नव्या महाराजाला थांबवा-वेतवडे सभेत टीका
महाराष्ट्र न्यूज वन  प्रतिनिधी, कोल्हापूर 
‘कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीला एक वेगळी धार चढत आहे. या निवडणुकीत शाहू महाराज छत्रपती यांच्या आडून एक नवा महाराज तयार होत आहे त्याला थांबवा, अशी टीका भाजपचे नेते पी. जी. शिंदे यांनी केली. हा कुटील महाराज तालुक्याला लाचारी करायला लावणारा, कुटुंबांना वेठीस धरणारा, डूख धरून सत्यानाश करणारा आहे, असेही ते म्हणाले.
 गगनबावडा तालुक्यातील वेतवडे येथे  महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत  शिंदे बोलत होते.  पालकमंत्री हसन मुश्रीफ सभेच्या अध्यक्षस्थानी होते. 
पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, खरतर ही निवडणूक शाहू महाराज छत्रपती विरूध्द प्रा. संजय मंडलिक अशी नाहीच आहे. ही लढाई राजा विरुद्ध रयत अशी आहे. रयतेचे प्रतिनिधी म्हणून प्रा. संजय मंडलिक यांना विजयी करून गोरगरिबांची अस्मिता जपूया. 
प्रा. संजय मंडलिक म्हणाले, विरोधक विकासाच्या मुद्द्यावर न बोलता हुकूमशाहीची भाषा बोलत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात पँलेस पाँलीटिक्स करून जनतेची दिशाभूल करीत आहेत. आम्ही केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विकासगंगा गावागावात पोहचवत विकासाचे हिंदुत्व जपण्याचे काम केले आहे. विरोधकाकडे विकासाचे व्हिजन नसल्याने भावनिकतेचा मुद्दा पुढे करीत आहे.’   
     खासदार धनंजय महाडिक म्हणाले, विरोधक विकासाबद्दल न बोलता 'लोकशाही धोक्यात आहे', 'संविधान बदलले जाणार', 'गादीचा अपमान.. ', असे विविध सांगावे करीत आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळेच  मंडलिक यांचे वैयक्तिक चारित्र्यहनन करून निंदानालस्ती करीत आहेत.   
 माजी आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने देशाला गतिमान नेतृत्व मिळाले आहे. गगनबावडा तालुक्यात दहशतीच्या राजकारणाला विरोध करू. या तालुक्याच्याचे राजकारण बदलण्याची भूमिका घेऊ या.
  यावेळी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब -आसुर्लेकर, के. एस. चौगुले, गोकुळचे संचालक अजित नरके, जिल्हा परिषद सदस्य मेघाराणी जाधव, एकनाथ शिंदे, लहू गुरव, तानाजी काटे, स्वप्नील शिंदे, दिलीप पाटील, शिवाजी देसाई, नंदकुमार पोवार, बाबासो पाटील, डॉ. आनंदराव गुरव, राजवीर नरके उपस्थित होते.