Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
टीईटी परीक्षेसाठी राज्यभरात सहा लाखावर परीक्षार्थी, १८ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉचगांधीनगर परिसरातील बांधकामाबाबत भाजप - शिवसेनेने भूमिका स्पष्ट करावी, सुनील मोदींनी तो व्हिडिओ दाखवावाशिवाजी विद्यापीठातर्फे ४१० विद्यार्थ्यांना २९ लाखाहून अधिक शिष्यवृत्ती प्रदानशिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू संशोधन केंद्राच्या प्रभारी संचालकपदी डॉ. मंजुश्री पवारब्राह्मण सभा करवीर मंगलधामतर्फे श्री राम कथाचे आयोजनत्या शिक्षकांना टीईटीतून सवलत मिळावी - भरत रसाळेपाणी टंचाईवरुन नगरसेवकांचा प्रशासनावर हल्लाबोल, पाणीपट्टी दरवाढीचा प्रस्ताव टाकला लांबणीवरशिवाजी विद्यापीठाच्या इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या १५० विद्यार्थ्यांची कंपन्यात निवडशिवाजी विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे १९ विद्यार्थी यशस्वीकोल्हापुरात रविवारी राजर्षी शाहू राष्ट्रीय विचार परिषद

जाहिरात

 

कोल्हापूर उत्तर तर जिंकणारच, दक्षिणचा आमदारही शिवसेना ठरविणार – राजेश क्षीरसागर

schedule07 Oct 24 person by visibility 744 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘कोल्हापूर उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला पोषक वातावरण आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ जिंकूच शिवाय कोल्हापूर दक्षिणचा आमदारही शिवसेना ठरवेल.’असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
शिवसेनेतर्फे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी झाला. कळंबा येथील अमृतसिद्धी मंगल कार्यालय येथे हा मेळावा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनामुळे सामान्य माणूस सुखावला असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. याप्रसंगी क्षीरसागर यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून कोल्हापूरच्या विकासाठी शेकडो कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्या माध्यमातून कोल्हापूर उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघात विकासकामे केली आहेत. दोन्ही मतदारसंघात भगवा फडकेल. महायुतीचे नेते जो निर्णय घेतील तो मान्य असेल. मात्र सगळी पदे आपल्याच घरात पाहिजेत असे काही जण म्हणत आहेत. पण जनता सर्वश्रेष्ठ असते. जनता सर्व ठरवत असते.’असा टोलाही लगाविला. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात नागरी सुविधासाटी निधी दिल्याचे क्षीरसागर यांनी आकडेवारीसह सांगितले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांचेही भाषण झाले. मेळाव्याला माजी नगरसेवक अमोल माने, शिवाजी जाधव, रमेश खाडे, किशोर घाटगे, महेंद्र घाटगे, रणजित जाधव, अमरजा पाटील आदी उपस्थित होते. जिल्हा नियोजन समिती सदस्य अंकुश निपाणीकर यांनी प्रास्ताविक केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes