Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळकडून म्हैस - गाय दूध खरेदी दरात वाढराखीव कर्मचारी निवडणूक भत्ता : लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित शाश्वत विकास म्हणजे सर्वांगीण विकास होय  : डॉ. यशवंत थोरातअहिंसा-सत्य -अस्तेय ही मूल्ये आजच्या समाजाची अपरिहार्य गरज — डॉ. सुषमा रोटेउदंड होणार नगरसेवक, नावापुढे पद -शहरासाठी योगदानाचे काय ? स्वीकृतच्या पदाचीही खांडोळी ! !कास्ट्राईब कर्मचारी कल्याण संघटनेतर्फे शिवजयंती उत्साहात साजरीडीवाय पाटील हॉस्पिटल, अभियांत्रिकी प्रेसिडेंट कप क्रिकेट स्पर्धेचे विजेतेराजर्षी शाहू जन्मस्थळ संग्रहालयाचा शनिवारी लोकार्पण सोहळावाढदिवसाला विधायक उपक्रमांची जोड, सुरेंद्र जैन यांचा आदर्शवत पायंडानिसर्गाची हानी न करता केलेला विकास हा खऱ्या अर्थाने शाश्वत विकास – कुलसचिव व्ही. एन. शिंदे

जाहिरात

 

कोल्हापूर उत्तर तर जिंकणारच, दक्षिणचा आमदारही शिवसेना ठरविणार – राजेश क्षीरसागर

schedule07 Oct 24 person by visibility 630 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘कोल्हापूर उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला पोषक वातावरण आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ जिंकूच शिवाय कोल्हापूर दक्षिणचा आमदारही शिवसेना ठरवेल.’असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
शिवसेनेतर्फे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी झाला. कळंबा येथील अमृतसिद्धी मंगल कार्यालय येथे हा मेळावा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनामुळे सामान्य माणूस सुखावला असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. याप्रसंगी क्षीरसागर यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून कोल्हापूरच्या विकासाठी शेकडो कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्या माध्यमातून कोल्हापूर उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघात विकासकामे केली आहेत. दोन्ही मतदारसंघात भगवा फडकेल. महायुतीचे नेते जो निर्णय घेतील तो मान्य असेल. मात्र सगळी पदे आपल्याच घरात पाहिजेत असे काही जण म्हणत आहेत. पण जनता सर्वश्रेष्ठ असते. जनता सर्व ठरवत असते.’असा टोलाही लगाविला. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात नागरी सुविधासाटी निधी दिल्याचे क्षीरसागर यांनी आकडेवारीसह सांगितले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांचेही भाषण झाले. मेळाव्याला माजी नगरसेवक अमोल माने, शिवाजी जाधव, रमेश खाडे, किशोर घाटगे, महेंद्र घाटगे, रणजित जाधव, अमरजा पाटील आदी उपस्थित होते. जिल्हा नियोजन समिती सदस्य अंकुश निपाणीकर यांनी प्रास्ताविक केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes