+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustअजित पवार गटाकडून 38 उमेदवारांची यादी, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटलांचा समावेश adjustबाबाभाई वसा म्हणजे कोल्हापूरच्या उद्यमनगरीचा अभ्यासू-उद्योजक ! शोकसभेत उद्योजकांनी जागविल्या आठवणी !! adjustविभागीय क्रीडा स्पर्धेत शहीद महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे यश adjust कोल्हापुरात काँग्रेसचा सरप्राइज चेहरा कोण ? आज उत्तर मिळणार ! adjust शिवसेनेकडून आमदार प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरकेंना उमेदवारी adjustदक्षिणमध्ये पाटील, महाडिकांनी घेतले अर्ज ! उत्तरसाठी अर्ज घेणाऱ्यांत व्ही.बी, सत्यजित कदम यांची नावे !! adjustदूध उत्पादकांसाठी खुशखबर, गोकुळतर्फे नवीन ४००० बायोगॅस मंजूर ! चेअरमन अरुण डोंगळे adjustप्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांंना ३५ हजार रुपयांचा दंड, ३०० किलो प्लॅस्टिक जप्त adjustराहुल आवाडे गुरुवारी अर्ज भरणार adjust कोल्हापुरात बाइकस्वारांची धूम
1001157259
1001130166
1000995296
schedule23 Sep 24 person by visibility 226 categoryजिल्हा परिषद
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापॅूर : घनकचरा संकलनासाठी ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या ई घंटागाड्यांचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
     स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सत्तर टक्के निधी उपलब्ध असलेल्या ग्रामपंचायतींनी मागणी नोंदविल्यानुसार जिल्ह्यातील ४६ ई घंटा वाहनांचा पुरवठा राज्य स्तरावरुन करण्यात येत आहे. यापैकी राज्याकडुन प्राप्त झालेल्या प्रतिनिधिक स्वरुपातील दोन ई घंटागाड्यांचे वितरण पन्हाळा तालुक्यातील ग्रामपंचायत आरळे व शाहूवाडी तालुक्यातील थेरगावचे सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.
      यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस.कार्तिकेयन, जिल्हा समन्वयक तथा प्रकल्प संचालक माधुरी परीट, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव उपस्थित होते. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी गाव स्तरावर नॅडेफ, गांडुळ खत, कचरा वर्गीकरण शेड, तालुका स्तरावर प्लॅस्टिक प्रकीया केंद्र या प्रकल्प यंत्रणा उभारल्या आहेत. या प्रकल्पामध्ये प्रत्येक घरातून तयार होणारा घनकचरा वर्गीकरण करुन, त्याचे खतात रुपांतर होण्यासाठी, कचऱ्याची प्रकल्पापर्यंत वाहतूक करण्यासाठी राज्य शासनाच्या पाणी व स्वच्छता विभागाकडून ई- घंटागाड्या पुरविण्यात येत आहेत.  यावेळी या ई घंटागाड्यांची पाहणी मुख्य कार्यकारी अधिकारी एस.कार्तिकेयन यांनी केली. तसेच गावातील कचरा संकलन करताना कुटुंब स्तरावरच ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करण्याच्या सूचना केल्या.