Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळच्या निवडणुकीसाठी नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील-चुयेकर,  बाळासाहेब खाडेंचे अर्ज दाखलमुश्रीफांनी जाहीर केलेल्या गोकुळच्या ठराव संख्येवरून भाजपच्या नेत्यांना मिरचीचा ठसका का लागला ? युवराज पाटील हसन मुश्रीफांचे भाजपला थेट चॅलेंज ! गोकुळसाठी कोल्हापुरात ठरावांची बेरीज, पदवीधर आमदारकीसाठी सांगलीत शड्डू !!जिल्हा परिषदेत गणरायाची प्रतिष्ठापना !  सदस्य - पदाधिकाऱ्यांचा पुढाकार, आरतीला मंत्र्यांची उपस्थिती ! !आनंदराव पाटील- चुयेकरांच्या समाधीला माजी संचालकांचे अभिवादनगोकुळच्या जागा वाटपावरुन महायुतीत वादाचे फटाके! मंत्री मुश्रीफ हे भाजपची ताकत गौण असल्याचा संदेश देत आहेत का? खासदार महाडिकांचा सवालडॉ. शिवशंकर मारजक्के यांचा अॅवार्ड ऑफ एक्सलन्सने सन्मानशिक्षकांचा सन्मान की निवडणुकीचा शो ?जनसुराज्य शक्तीचे नवे पदाधिकारी, युवक जिल्हाध्यक्षपदी अक्षय जरग ! शहराध्यक्षपदी शेखर जाधव, माजी नगरसेवक आर.डी.पाटील जनसुराज्यमध्ये ! !अचानक शाळा भेटी ! पायाभूत सुविधा, गुणवत्तेची तपासणी ! !

जाहिरात

 

करवीरमध्ये चंद्रदीप नरके विजयी ! निसटत्या पराभवाने पाटील गटाला चटका !!

schedule24 Nov 24 person by visibility 741 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शेवटच्या फेरीपर्यंत उत्कंठा वाढीस लागलेल्या करवीर विधानसभा मतदारसंघाची लढत शिवसेनेचे उमेदवार चंद्रदीप नरके यांनी जिंकली. दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनानंतर झालेल्या या निवडणुकीत सहानुभूतीच्या लाटेवर काँग्रेसचे उमेदवार राहुल पाटील विजयी होतील अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र या मतदारसंघात पाटील यांना १९७६ मतांनी पराभव पत्करावा लागला. हा निसटता पराभव पाटील गटाला चटका लावणारा ठरला.

करवीरमध्ये  चंद्रदीप नरके यांना एक लाख ३४ हजार ५२८ तर राहुल पाटील यांना एक लाख ३२ हजार ५५२ मते मिळाली. संताजी घोरपडे यांना ७९३१ मते मिळाली. या मतदारसंघात एकूण २ लाख ७६ हजार २४५ इतके मतदान झाले होते. २५ फेऱ्यांमध्ये मतमोजणी झाली. करवीर विधानसभा मतदारसंघात गगनबावडा आणि पन्हाळा तालुक्यातील गावांचा समावेश आहे. नरके यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली.

करवीरमध्ये चंद्रदीप नरके विजयी ! निसटत्या पराभवाने पाटील गटाला चटका !!वीस फेऱ्यापर्यंत नरके यांच्याकडे आघाडी होती. या पुढील फेरीत राहुल पाटील यांनी चांगले मते घेत पिछाडी भरुन काढली. यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आशा उंचावल्या तर नरके यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक वाढली. शेवटच्या फेरीत काय घडणार ? याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या. या फेरीतील मताधिक्क्याच्या आधारे नरके हे १९७६ मतांनी विजयी झाले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes