महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय, तिटवे आणि दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय कविता - ओवी संमेलन व स्पर्धां आयोजित करण्यात आल्या आहे.२८ व २९ जानेवारी २०२३ रोजी शहीद सभागृहात स्पर्धा नियोजित आहेत. स्पर्धेमध्ये अकरावी पासून पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या युवती सहभागी होऊ शकतात. स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या युवतींना एक हजारपासून पाच हजार रुपये बक्षिसे जिंकण्याची संधी आहे.उत्तेजनार्थ ५०० रुपयांची पाच बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.
कविता स्पर्धेसाठी विषयाची मर्यादा नाही, मात्र स्पर्धेमध्ये सादर होणारी कविता स्वरचित असावी. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना राज्यातील सुप्रसिद्ध कवयित्रींचे मार्गदर्शन मिळणार आहे. २७ जानेवारीपर्यंत स्पर्धकांनी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. कवितांची निवड तज्ञ परीक्षक करणार आहेत. स्पर्धेसाठी कोणत्याही प्रकारची प्रवेश फी नसल्याने या स्पर्धेमध्ये महाविद्यालयीन युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ऐश्वर्या शिवाजी कवडे ( 9309275737) यांच्याशी संपर्क साधावा.