महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : " दिव्यांग अधिकार अधिनियम २०१६ " नुसार कोल्हापूर जिल्हयातील दिव्यांगांना दिव्यांग व्यक्तींना वैश्विक ओळखपत्र बंधनकारक आहे. त्यामुळे २०१६ पासून कोल्हापूर जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामधून दिव्यांग व्यक्तींना ओळखपत्र देणे बंद करणेत आले आहे. तसेच इतर कोणत्याही शासकीय अथवा खाजगी यंत्रणेस दिव्यांग ओळखपत्र देण्याचे अधिकार सरकारने दिलेले नाहीत. तसेच समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर या कार्यालयाकडून यापूर्वी देण्यात आलेली सर्व दिव्यांग ओळखपत्रे यापुढे वैध मानली जाणार नाहीत. याची नोंद सर्व शासकीय कार्यालयांनीही घ्यावी. ज्या दिव्यांग व्यक्तींनी अद्यापही वैश्विक ओळखपत्र (UDID Card ) काढलेले नाही अथवा त्यासाठी ऑनलाईन नोंदणी केलेली नाही अशा दिव्यांग व्यक्तींनी वैश्विक ओळखपत्रासाठी ऑनलाईन पध्दतीने नोंदणी केलेली नाही त्यांनी https:/ /www. swavlambancard. gov. in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करुन वैश्विक ओळखपत्र प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी केले आहे.