अमृत योजनेतील कामाच्या शुभारंभाप्रसंगी टीकास्त्र !!
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या पत्राची दखल पालकमंत्री घेत नाहीत. परंतु जनतेने नाकारलेल्यांना सोबत घेऊन विकास कामांबाबत पालकमंत्री नवीन पायंडा पाडू पहात आहेत, तो लोकशाहीला घातक आहे. तो हाणून पाडण्यासाठी कार्यकर्त्यांनी दक्ष रहावे असे आवाहन विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केलं.
आमदार जयश्री जाधव यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या अमृत योजनेतील पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन बदलण्याच्या कामाचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. टिंबर मार्केट कमान, संभाजीनगर ते नंगीवाली चौक, नंगीवाली चाौक ते कोळेकर तिकटी या कामाचा शुभारंभ मंगळवार पेठेतील शाहू बँक चौकात झाला.
केएमटीच्या ताफ्यात वातानिकुलित (एसी) बसचा समावेश व्हावा, यासाठी आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील व मी तिघांनी प्रत्येकी एक कोटी असे तीन कोटी रुपयांचा निधी दिला होता. मात्र त्याची बिल ही ट्रेझरीतून निघाली नाहीत. यामुळे कोल्हापूरकरांचा एसी बसचा प्रवास लांबला आहे, यास सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला.
आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार सतेज पाटील यांच्या २०२२ -२३ मधील आमदार फंडाची बिल देण्यास ही सरकारकडून टाळाटाळ होत असल्याची खंत आमदार पाटील यांनी व्यक्त केली. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, प्रसाद जाधव यांची भाषणे झाली.
कॉग्रेसचे गटनेते शारंधर देशमुख, कॉग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, दुर्वास कदम, सचिन पाटील, विनायक फाळके, संभाजी देवणे, संभाजी जाधव, चंद्रकांत चिले, उमेश पोवार, कुणाल शिंदे, बाळासाहेब पोवार, राहूल भोई, अशोक पोवार, किरण अतिग्रे, प्रसाद जाधव, जयकुमार शिंदे, रमेश पुरेकर, राजू साबळे, श्रीकांत माने, अभिषेक देवणे, भिमराव पोवार, दीपक थोरात, अमित पोवार, मतिन बोधले, कोल्हापूर महापालिका जलअभियंता नेत्रदीप सरनोबत उपस्थित होते.