महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्यातर्फे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा जनजागरण अभियान झाले. उजळाईवाडीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत शेडगे, सहाय्यक पोलीस निरिक्षक कविता नाईक व पोलीस हवालदार राहूल देसाई यांनी कारखान्यास ऊस पुरवठा करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर, लहान ट्रॅक्टर व बैलगाडी वाहन चालकांना वाहनाच्या पुढे पांढऱ्या रंगाचे, पाठीमागे लाल रंगाचे आणि वाहनाच्या दोन्ही बाजूला पिवळ्या रंगाचे रिफ्लेक्टर बसविणे अत्यावश्यक असल्याबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच रस्त्यावर वाहन चालविताना चालकांनी पाळावयाचे नियम व चिन्हे तसेच वाहनांची गती कमी ठेवणे, वाहनांचा आवाज कर्कश नसावा, क्षमतेपेक्षा जादा ऊस भरू नये, रात्रीच्यावेळी प्रखर दिवे असू नयेत, वाहन चालक लायसन्सधारक व अनुभवी असावा, वाहतूक करीत असताना वाहनामध्ये टेपरेकॉर्ड लावू नये,
वाहनांचे विमा व इतरबाबी पूर्ण कराव्यात, टॅक्स व विमा भरलेल्याची पावती सोबत ठेवावी, अपघाताच्यावेळी वाहन
रस्त्यात सोडून जावू नये, मद्य प्राशन करुन वाहन चालवू नये, याबाबत घ्यावयाच्या दक्षतेबाबत मार्गदर्शन केले.कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी किरण कांबळे यांनी स्वागत केले.
सहाय्यक फौजदार बी. एन. शिंदे, हुपरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक आर. एल. हजारे, कारखान्याचे उप मुख्य शेती अधिकारी भास्कर पट्टणकुडे उपस्थित होते. कारखान्याचे संचालक सुरज बेडगे यांनी आभार मानले.