महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : लिंगायत समाज संस्था - राणी चन्नम्मा महिला मंडळ कोल्हापूरतर्फे प्रजासत्ताक दिन व मकर संक्रांतिनिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या. कागलच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे - तहसीलदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
महिलांना मार्गदर्शन करताना तहसीलदार ठोकडे म्हणाल्या, बाराव्या शतकात महिलांना समान अधिकार देणारे महात्मा बसवन्ना यांचे विचार काळाच्याही पुढचे आहेत. महिलांनी आपल्यातील सुप्त गुणांना वाव देऊन समाजात आपल्या कर्तुत्वाने पुढे आले पाहिजे. यावेळी आपली आजपर्यंतची वाटचाल कशी झाली याबद्दलही त्यांनी महिलांशी वार्तालाप केला. फक्त गेम्स आणि हळदीकुंकू यात अडकून न राहता स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासासाठी सुद्धा वेगवेगळे उपक्रम घ्यावेत" स्पर्धेतील विजेत्यांना त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात श्रद्धा चितारी यांनी सादर केलेल्या गणेश वंदनाने झाली. विणा पाटील यांनी स्पर्धेचे संयोजन केले.
पाहुण्यांची ओळख नवउद्योजिका वेदिका पाटील यांनी करून दिली. पाहुण्यांचे स्वागत मंडळाच्या अध्यक्षा राजश्री सावर्डेकर यांनी केले. लिंगायत समाजाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या सरला पाटील यांनी प्रास्ताविक केले. वारणा वडगावकर यांनी सूत्रसंचालन केले
महात्मा बसवेश्वरांचे वचन गायन महानंदा पाटील यांनी केले . कार्यकारी मंडळातील सदस्या वैशाली पाटील, मंदाकिनी तंबाके , नंदा निर्वाणी, अर्चना हिडदुग्गी ,श्वेता तारळी, उमा आंबोळे , स्नेहा शिंत्रे यांच्यासह सर्व महिलांनी नियोजनात सहभाग घेतला.