महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात जोरदार पाउस झाला. धुवाधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग होत आहे. नद्यांची पाणी पातळी वाढत आहे.कोल्हापूर शहरानजीक असलेल्या कळंबा तलावही काठोकाठ भरला आहे. शनिवारी आणि रविवारी (दहा व अकरा सप्टेंबर) झालेल्या पावसामुळे कळंबा तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. सांडव्यावरुन पाणी वेगाने प्रवाहित होत आहे.