महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : बिंदू चौक ते आझाद चौक मा रस्त्याची डागडुजीच्या नावाखाली दयनीय अवस्था केली आहे. येत्या दहा दिवसात या रस्त्याची दुरुस्ती न केल्यास रस्ता रोको आंदोलन करू असा इशारा कोल्हापूर जनशक्ती संघटनेने केला आहे.
कोल्हापूर जनशक्तीचे समीर नदाफ यांनी पत्रकात म्हटले आहे, "
पावसाळ्यानंतर दुरुस्तीच्या नावाखाली या रस्त्यावर खडी आणि दगडांचा खच रचला गेला आहे.खाचाखळग्यांनी भरलेल्या रस्त्यावरून दररोज हजारो नागरिक आपला जीव मुठीत घेऊन वाहने चालवतात.महिला व वयस्कर लोकांना कसरत करत हा रस्ता पार करावा लागतो.अनेकवेळा वाहनांच्या चाकातून बाजूचे दगड उडून नागरिकांना इजा होण्याचे प्रकारही वाढत आहेत.
याबाबत महापालिकेकडे स्थानिक रहिवासी,वाहनधारक,दुकानदार यांनी तक्रारी केल्या आहेत.परंतु अद्यापही हा रस्ता झालेला नाही नववर्षाच्या सुरुवातीला हा रस्ता न केल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा संघटनेतर्फे समीर नदाफ, अरुण अथणे, अनिष पोतदार, बाळासो शारबिद्रे, तय्यब मोमीन यांनी दिला आहे.