महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :
भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त सरकारने दिलेल्या सुचनेनुसार जिल्हा परिषद येथे बुधवारी (ता.१७ ऑगस्ट) सकाळी अकरा वाजता समूह राष्ट्रगीत गायन करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, प्रकल्प संचालक डॉ. रवि शिवदास यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
याप्रसंगी सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई, मुख्य लेखा व वित्त अधिकारी व्ही.टी. पाटील, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिल्पा पाटील, प्रभारी कार्यकारी अभियंता महेंद्र क्षीरसागर, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा अशोक धोंगे , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, शिक्षणाधिकारी आशा उबाळे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी दिपक घाटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विनोद पवार , कृषि विकास अधिकारी भीमाशंकर पाटील उपस्थित होते.