+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...! adjustमुश्रीफांचा विरोधकांना सवाल, राजकारणासाठी किती अपप्रचार करणार ? adjustमोदींची शनिवारी तपोवन मैदानावर सभा ! महायुतीकडून तयारी सुरू!! adjustगोकुळमध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustडीवाय पाटील फार्मसीतर्फे रविवारी मेगा पूल कॅम्पस ड्राईव्ह adjustछत्रपतींच्या सुनेच्या मोटारीचे कुपेकरांच्या कन्येने केले सारथ्य adjustकोल्हापूरसाठी २३ ! हातकणंगलेसाठी २७ उमेदवार लढणार !! adjustनरेंद्र मोदींची २८ एप्रिलला कोल्हापुरात जाहीर सभा ! राजेश क्षीरसागरांची माहिती
Screenshot_20240226_195247~2
schedule14 May 23 person by visibility 647 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर: दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने देण्यात येणाऱ्या २०२२ मधील ग्रंथ पुरस्कारासाठी वसंत गायकवाड, सीताराम सावंत, आबासाहेब पाटील, कविता ननवरे यांच्या पुस्तकांची निवड करण्यात आली आहे. २५ मे २०२३रोजी पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. पत्रकर गुरुबाळ माळी, आप्पासाहेब माळी, सतीश घाटगे लिखित कोल्हापूरचे महापौर  या पुस्तकाला विशेष पुरस्कार मिळाला आहे.  
 पुरस्कार प्राप्त पुस्तके आणि लेखकांची नावे अशी- देवदत्त पाटील पुरस्कार: वसंत गायकवाड - तथागत गौतम बुद्ध, (कादंबरी ), शंकर खंडू पाटील पुरस्कार: जयवंत आवटे- बारा गावचं संचित (कथासंग्रह), अण्णा भाऊ साठे पुरस्कार: सीताराम सावंत- हरवलेल्या कथेच्या शोधात , कृ.गो.सूर्यवंशी पुरस्कार: –विनायक होगाडे -डिअर तुकोबा ( संकीर्ण) , शैला सायनाकर पुरस्कार: आबासाहेब पाटील -घामाची ओल धरून (कवितासंग्रह), चैतन्य माने पुरस्कार (प्रथम प्रकाशन)- सगळेच ऋतू दगाबाज -कविता ननवरे (कवितासंग्रह ) आणि बालवाड्मय पुरस्कार- गांडूळाशी मैत्री -वंदना हुळबत्ते यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.
विशेष पुरस्कारामध्ये संत गाडगेबाबा समग्र ग्रंथ -रा. तु. भगत , राजर्षी शाहू आणि भटके विमुक्त - व्यंकाप्पा भोसले, जीवनरंग -अच्युत माने , पाषाणपालवी -बी. एम. हिर्डेकर, लढवया -सुभाष ढगे पाटील, ऑनलाईन शिक्षण पद्धती -गणपती कमळकर, सत्य असत्याशी मन केले ग्वाही- प्रशांत गायकवाड, रे आभाळा -रामकली पावसकर, आदिवासी कवितेचा परामर्श - गौतम जाधव, संचित- प्रकाश काशीद, आवडलं ते निवडलं -अभिजीत पाटील, थेंबातला समुद्र -वैष्णवी अंदुरकर, बाभूळमाया -विकास गुजर, कोल्हापूरचे महापौर -गुरुबाळ माळी/आप्पासाहेब माळी/सतीश घाटगे, सुलवान -मेघा रमेश पाटील, वर्तुळाच्या आतबाहेर अस्वस्थ मी -राजेंद्र शेंडगे, कपडे वाळत घालणारी बाई -हर्षदा सुंठणकर, ऐहिकाच्या मृगजळात- पूजा भडांगे, शाळा सुटली- प्रणिता शिपुरकर, पकाल्या -खंडेराव शिंदे, चैत्रायन-शैलजा टिळे- मिरजकर, वंचितांचे अंतरंग- अशोक बापू पवार, गझल लसाया- सिराज शिकलगार यांचा समावेश आहे
      दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने कोल्हापूर ,सांगली, सातारा ,सोलापूर या जिल्ह्यांसह सीमाभागातील मराठी लेखकांच्या उत्कृष्ट साहित्यकृतींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते २०२२ या वर्षातील ग्रंथ पुरस्कारासाठी परीक्षक म्हणून डॉ.रवींद्र ठाकूर, डॉ.व्ही. एन. शिंदे, डॉ. दिलीप कुलकर्णी, डॉ. गोपाळ गावडे,सुनील इनामदार,गौरी भोगले यांनी काम पाहिले.
 पुरस्कार वितरण समारंभ गुरुवार २५ मे,२०२३ रोजी सकाळी १०.३० वा.शाहू स्मारक भवन ,दसरा चौक,कोल्हापूर येथे मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याचे दमसाचे कार्याध्यक्ष प्रा. दि.बा.पाटील,कार्यवाह डॉ.विनोद कांबळे यांनी कळवले आहे.