महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : अरुणोदय चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दोन ते सहा डिसेंबर २०२२ या कालावधीत विद्यार्थ्यासाठी, शालेय वक्तृत्व व कथाकथन स्पर्धा आयोजित केली आहे. अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष देसाई यांनी दिली. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या गटात कै. लक्ष्मीबाई देसाई शालेय वक्तृत्व स्पर्धा होतील. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या गटासाठी कै. राजाराम देसाई शालेय कथाकथन स्पर्धा होणार आहे. कोल्हापूर शहर व आसपासच्या शाळेतील विद्यार्थ्यांशी स्पर्धेतील सहभागासंबंधी संवाद साधला आहे. स्पर्धा रघुनंदन सांस्कृतिक भवन, क्रशर चौक येथे होणार आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे. स्पर्धेचे यंदाचे १८ वे वर्ष आहे.