महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
राष्ट्रीय मुल्यमापन समितीकडून (नॅशनल बोर्ड ऑफ अॅकिडीटेशन, नवी दिल्ली) भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी कोल्हापूर या महाविद्यालयास सलग तिस-यांदा एनबीएचे पुर्नमानांकन मिळाले आहे. समितीने १५ ऑक्टोंबर २०२२ रोजी महाविद्यालयास भेट दिली होती. या समितीमध्ये प्रा. डॉ. बी. पी. श्रीनिवासन (दिल्ली) यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिले डॉ. किशन वारंगळ सदस्य होते.
समितीकडुन आऊटकम बेस्ड एज्युकेशन (ओबीई ) या तत्वावर विद्यार्थ्याचा होणारा सर्वागीण विकास, महाविद्यालयातील उच्च शिक्षण व संशोधन विषयक कामकाज, महाविद्यालयाची इमारत, प्रयोगशाळा, संगणकविभाग, इंटरनेट, ग्रंथालयातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिके, ऑनलाईन नियतकालिके यांचे सुक्ष्म मुल्यमापन करण्यात आले. तसेच महाविद्यालयास मिळालेले चाळीस पेटंटस, १००० हून अधिक प्रकाशित संशोधन पेपर्स महाविद्यालयातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरहसादर शोधनिबंध, महाविद्यालयातील शिक्षकांची दहा प्रकाशीत पुस्तके याची समितीकडून विशेष दखल घेण्यात आली.
शिवाजी विद्यापीठ फार्मसी कार्य क्षेत्रात एन.बी.ए चे तिस-यांदा पुर्नमानांकन मिळालेले भारती विद्यापीठ
कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर हे एकमेव फार्मसी महाविद्यालय आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एन. मोरे, एन. बी.ए समन्वयक व उपप्राचार्यडॉ. एम. एस. भाटीया, उपप्राचार्य डॉ. एन. आर जाधव शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे संस्थेचे कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम, कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, मानंद संचालक डॉ. एच. एम. कदम यांनी अभिनंदन केले.