कोल्हापूर पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
गहाळ आणि चोरीस गेलेले 26 लाख किमतीचे 267 मोबाईल कोल्हापूर पोलिसांनी अतिशय कौशल्याने तपास करत मूळ मालकांना त्यांचे मोबाईल परत दिले. पोलिसांच्या तपासाचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.
जिल्ह्यात मोबाईल चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे, बाजारपेठा, मंडई, बस आणि रेल्वे स्थानके, सार्वजनिक ठिकाणे या ठिकाणी मोबाईल चोरीच्या व गहाळ झालेल्या तक्रारी पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात दाखल झाल्या आहेत. या तक्रारीची दखल घेऊन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी मोबाईल चोरी तपासाचा छडा लावण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलीस निरीक्षक तानाजी सावंत सायबर कक्षाच्या फौजदार कोमल पाटील, अमर वासुदेव,सागर माळवे, रवींद्र पाटील , प्रदीप पावरा,यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी गहाळ झालेल्या मोबाईल संचांचा तांत्रिक तपास करून मोबाईलचा शोध घेतला. चोरीस गेलेले मोबाईल हे कर्नाटकासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात कार्यरत होते. पोलिसांनी मोबाईल ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात तक्रार केल्यामुळे मालकांना कागदपत्रे तपासून मोबाईल देण्यात आले. आज बुधवारी पोलीस अधीक्षक बलकवडे, पोलीस निरीक्षक सावंत, फौजदार कोमल पाटील, यांच्या उपस्थितीत मूळ मालकांना मोबाईल प्रदान करण्यात आले. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांच्यासह महेश गुरव, सागर राठोड, सुधीर पाटील, रवींद्र गाडेकर, विशाल पाटील, सुहास पाटील, अजय सावंत, संजय बेंडखळे, विनायक बाबर, दिलीप पोवार, रेणुका जाधव, पुनम पाटील, संगीता खोत यांनी तपासात सहभाग नोंदवला